Monday, April 30, 2012

बायका आणि त्यांची कामे -- २




यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन यांची फारकत करू नये, त्याने प्रत्येकाचीच ओढाताण होते, त्यातल्या त्यात बाईची जास्त होते.
 यातली गोची अशी आहे की जर आपण नोकरीच्या ठिकाणी, घरच्या जबाबदार्‍या असल्यामुळे बाईला सवलत द्यायला लागलो तर घर व्यवस्थापन सांभाळणे हे तिचेच काम आहे, हे पक्के होत जाईल, अधिकृतरित्या आपण ते मान्य करतो आहोत असे होईल, मग पुरूष ही जबाबदारी घेणारच नाहीत, तसे व्हायला नको आहे. घर चालवणे ही दोघांचीही जबाबदारी आहे, त्यासाठी काहीवेळा पुरूषांनांही सवलती दिल्या/ घेतल्या जाव्यात. घर सांभाळणे, माणसे सांभाळणे, हे काही दुय्यम काम नाही, हे ठसत जायला हवे आहे.


 श्रीराज,
 निसर्गाने जेवढा भेद केला आहे, तेव्ह्ढ्यापुरत्याच सवलती बाईला मिळाव्यात. गरोदरपण आणि अपत्याला जन्माला घालणे ही कामे निसर्गाने बाईवर सोपवलेली आहेत, पण तेव्हढीच, मूल सांभाळणे, मूल वाढवणे ही कामे निसर्गाने केवळ बाईची गणलेली नाहीत, ती कामे पुरूषांनीही करायला हवीत.

 दीपा,
>>घर/मुलं संभाळणं याला काय अक्कल लागते?,
 असा सूर असेल तर घरातल्या बाईने तसं नसतं हे दाखवून द्यायला हवं. ते अवघड असतं.
>>समाजाला दाखवायला,चारचौघांच्यात मिरवायला या पुरुषांना शिकलेल्या बायका लागतात.पण तिने स्वत:चे काही आवडीचे करायचे म्हणाले तर घर ,मुलं संभाळून काही करायचे असेल तर करायचे अश्या मताचे पुरुष आज घरोघरी दीसतात.
घरोघरी नसतील, पण दिसतात. बायकांनीही वस्तू होणं नाकारायला हवं

अपर्णा,
 तुझ्यासारखं, एक पाऊल मागे घेणं हे काही काही पुरूषही करतात,
 >>माझी मुलं, त्यांना वेळ देणं हेही माझंच काम आहे आणि त्यातल्या अचिव्हमेंटमधला माझा आनंद कुणीही समजू/हिरावू शकणार नाही...:)
 हे केवळ बाईनेच का म्हणायचं? अपवादात्मक पण पुरूषही हे म्हणू लागले आहेत. ते स्वागतार्ह आहे.
 खरं म्हणजे तू जसा तुझा आनंद शोधू शकते आहेस, तसा प्रत्येकाला शोधता यायला हवा.

अश्विनी,
 >> त्यामुळे अर्थार्जनाच्या क्षेत्रात कामाच्या वेळा, हक्काच्या रजा, सवलती या बाबतीत, घरातल्या कामांची कोणतीही जबाबदारी नसलेला पुरुष हाच प्रमाण मानला गेला आहे.
 खरं आहे.
>> कामावर पोचायला एखादीला उशीर होत असेल तर बाकीच्यांनी ते समजून घेतले पाहिजे?
 होय. म्हणजे दरवेळीच नाही, तिची कारणं जाणून घेऊन, तेच एखाद्या पुरूषासाठीही, व्यवस्थापनाचे कामगारांच्या घरगुती/ खाजगी बाबींशी आपल्याला काही देणे घेणे नाही, असे धोरण असू नये.

>>अर्थार्जनासाठी घरदार वाऱ्यावर सोडून द्यायला लावणारी ही व्यवस्था बदलणं, 'घर, मूल ही बाईचीच जबाबदारी' या आपल्या गृहीतकात बदल झाल्याशिवाय अशक्यच आहे. पुरुषांसाठी हे गृहीतक फार सोयीचं असल्यानं त्यांच्याकडून अशा बदलाची अपेक्षा ठेवणं हे तर अनैसर्गिकच वाटावं अशी परिस्थिती अजूनही आहे. पण हळूहळू का होईना, हे बदल घडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि तसे प्रयत्नही करूया.
अनुमोदन!

मोहिनी,
 >> सांसारिक अडचणींचा विचार करता कायम सवलती घेण्याकडे स्त्रियांचा कल नाईलाजाने वाढत जातो.
 खरं आहे

 >> लग्न करणे-न करणे, मूल जन्माला घालणे-न घालणे हे सामाजिक नव्हे तर वैयक्तिक प्रश्न आहेत,
  वरवर हे मान्य होण्यासारखेच आहे. पण तसं नसतं. बाई मूल जन्माला घातते त्यावेळी पुढची पिढी जन्माला घालत असते, समाज पुढे नेत असते. हे सामाजिक प्रश्नही आहेत. म्हणून तर एक किंवा दोन मुले पुरेत ची घोषणा होते, मुलींचे प्रमाण मुलग्यांच्या तुलनेत कमी होत आहे त्यामुळे कितीतरी सामाजिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

>>  स्त्रियांना बाहेरील कामाच्या जागी वेळेच्या आणि उत्पादनक्षमतेच्या (घरी १००% द्यावेच लागत असल्याने) मर्यादा आहेत त्यामुळे त्यांनी त्या स्वीकारून समान वेतनाचा आग्रह धरू नये असे मला वाटते. जिला तसे वाटते तिने घर आणि करियर यांना स्वतंत्र पारड्यात ठेवावे.
  हा खूप पुरूषी दृष्टीकोन आहे. घर/मुलं सांभाळणे ही बाईचीच जबाबदारी आहे, या गृहितकाला धक्का लावला पाहिजे.

1 comment:

  1. विद्या,

    बहुतांशी स्त्रीयांनी ह्या प्रश्नांच्याबाबातीत सामाजिक दडपणांमुळे सोपी व्याख्या करुन स्वत:ला बंद करुन घेतलं आहे.

    खूप छान विश्लेषण केलं आहेस.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...