Friday, February 28, 2014

देव - ७

माणसाच्या काही आदिम गरजा असणार,
अन्न, वस्त्र, निवार्‍याच्या पलीकडच्या, भावनिक गरजा...
प्रेम, भीती, भविष्याबद्दलची चिंता, म्रूत्यूबद्दलचे कुतूहल, मी कोण?, कुठून आलो? कुठे जाणार? असे मुलभूत प्रश्न,
जीवनातलं सातत्य, वंश पुढे चालू राहण्याची काळजी, सृष्टीच्या निर्मितीबद्दलचे कुतूहल....
या सगळ्यांची उत्तरे ’देव’ देतो, किंवा देव आहे.
देव ही कल्पना आयुष्याला एक स्थिरता देते.
म्हणूनच ती वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या माणसांच्या मनात घर करून राहिलेली आहे.

ज्या सगळ्या वेगवेगळ्या भीती माणसाला असतात,
मृत्यूची भीती असते, तर मृत्यूनंतर माणूस देवाकडे जातो, यात निश्चिंती आहे.
कधी मृत्यू येणार? देवाच्या मनात असेल तेव्हा.
भविष्याबद्दल चिंता? देव आहे चालवणारा... एव्हढेच काय तर देव बुद्धी देईल त्याप्रमाणे... देवाला आहे काळजी!

आत्मा एकच असून तो केवळ शरीरे / योनी बदलतो, ही हिंदू धर्मातली श्रद्धा,
जीवनातील सातत्य ......

मी गेल्यानंतर मुलाबाळांचं काय होईल?
किंबहुना माणसांचं काय होईल? माणूस जात टिकून राहिल ना?
तर राहणार आहे , हे आश्वासन देव देतो.

ही सृष्टी, जगातलं हे सारं अदभूत कसं निर्माण झालं असेल?
तर याचा निर्माता देव आहे, इतकं सोपं उत्तर देव ही कल्पना पुढ्यात ठेवते.

कुठलाही माणूस विचार करत गेला की मी कोण?, कुठून आलो? आणि कुठे जाणार? हे प्रश्न त्याला अस्वस्थ करणारच.
त्याचंही उत्तर देव देतो.

शरण जाणं, स्वत:ला कुणावर तरी सोपवणं हीसुद्धा माणसाची गरज असेल.

माणसाच्या वैयक्तिक गरजा जशा देव पूर्ण करतो
तशाच मानवी समूहाच्या काही गरजा आहेत
त्याही देव पूर्ण करतो.

समूहाची म्हणून एक नियमावली लागते, एक नैतिकता लागते,
त्यासाठी देव आहेच.
समूहाला एकत्र येण्यासाठी काही निमित्त लागतं.
तेही देव पुरवतो.

समुहासमोर कुणीतरी "रोल मॉडेल" असायला लागतं
देव ती भूमिका निभावतो.

समूहाला एक न्यायव्यवस्था लागते.
चांगलं वागण्याचा धाक आणि न वागल्यास शिक्षा,
हे दोन्हीही देव करतो.

*********
मग देवाची कल्पना स्विकारण्यात अडचण कसली आहे?

असं आहे की
देव स्वत: काहीही करत नाही.
तो त्याच्या भक्तांच्या / अनुयायांच्या ताब्यात आहे.
*********



Saturday, February 15, 2014

देव - ६

प्रेम हे सर्वव्यापी असतं.
बहुसंख्य हिंदी सिनेमे, हिंदी गाणी वर्षानुवर्षे एक " प्रेम " हा विषय धरूनच आहेत.
लोकप्रिय आहेत. लोकांच्या हृदयाला हात घालताहेत.
आपण कितीही नावं ठेवली तरी हिंदी सिनेमे लोकांच्या काही गरजा पूर्ण करतात, असं आहे,
म्हणूनच लोक ते पाहात असणार.
त्यातला महत्वाचा भाग हा आहे की कोणीतरी प्रेमाचं माणूस असणं, जिवाभावाचं कुणीतरी असणं,
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवी आहे.
कारण प्रेम ही एक मुलभूत भावना आहे, माणसाची गरज आहे.
आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपण आहोत तसं त्याच्याशी व्यक्त होता यावं, त्याने पोटाशी धरावं अशी आणि
आपण कुणावरतरी प्रेम करावं हीसुद्धा माणसाची गरज असते.

प्रत्येकालाच असं प्रेमाचं माणूस कुठून मिळणार?
प्रेमातल्या सोबत असणं, आधार असणं, जिवलग असणं,
या माणसाच्या गरजा " देव "  पूर्ण करतो.

माणूस हा कळपाने राहणारा, समाज निर्मून राहणारा प्राणी आहे.
त्याला सोबत लागते.
देवाची त्याला खात्रीची आणि कायमची सोबत मिळू शकते.
(देव या कल्पनेवर विश्वास ठेवता यायला हवा.)

मध्ययुगीन भक्तीपरंपरंपरेत, सूफी रचनांमधेही, देवाला प्रियकर मानलेलं आहे.

प्रेम माणसाला शुद्ध, निर्मळ, प्रामाणिक ....... अधिकाधिक चांगला माणूस बनवतं.
प्रेमात कसं आहे? स्वत:आधी दुसर्‍याचा विचार, त्याचं भलं, त्याग, त्याच्या सुखाची काळजी.
प्रेम ही माणूसपण उंचावणारी गोष्ट आहे.
माणसाचं सगळ्यात चांगलं रूप तो प्रेमात असतानाचं, प्रिय व्यक्तीसाठीचं आहे.

देव त्याच्यासाठी प्रिय व्यक्ती बनून येतो.

देव एकट्या, एकाकी माणसाला दुकटा करतो.
********

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...