Wednesday, February 29, 2012

इभ्रत-खून ( Honor killing)


औंध येथे आशा शिंदे या तरूणीची तिच्या वडीलांनी लोखंडी कांबीने मारून हत्या केली. ती वडीलांनी आणलेल्या मुलांना नाकारत होती, तिला तिच्या पसंतीच्या परजातीतल्या मुलाशी लग्न करायचे होते. मुलीची हत्या केल्यावर वडिल स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले, त्यांना केल्या कृत्याचा पश्चाताप होत नव्हता.
**********

ही बातमी आपल्याला भयंकर वाटते कारण जीवन अमूल्य आहे आणि कुणालाही स्वत:ची किंवा दुसर्‍या कुणाची हत्या करायचा अधिकार नाही, यावर आपला विश्वास आहे.

********

 आपल्या समाजात आजूबाजूला हे काय घडतं आहे? यापूर्वी अशा बातम्या हरीयाणा, पंजाबातून यायच्या. एका बापाने प्रत्यक्षात केलं म्हणजे कितीतरी बापांच्या सूप्तपणे हे मनात आहे.
 हा केवळ जातिव्यवस्थेचा पगडा नाही, त्यासंबंधी तर आपण वाचतोच कुठे, कुठे,
समाजातली सगळीचं माणसं जातीचं, धर्माचं, वर्णाचं, वंशश्रेष्ठत्वाचं, खोट्या प्रतिष्ठेचं.... कसलं कसलं ओझं घेऊन जगत असतात!
आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे.
इथे खून करणारा एकटा बाप दोषी नाही. त्याच्या मुलीने परजातीत लग्न केले तर त्याला समाजाच्या चौकटीत प्रतिष्ठितपणे जगू न देणारा आजूबाजूचा समाजही दोषी आहे.
 मुलीला, क्वचित प्रसंगी मुलालाही अशा प्रकारे मारलं जातं.
 आपल्या मर्जीने लग्न करू इच्छिणं/करणं हा इथे "जगणं नाकारणारा" गुन्हा ठरू शकतो.
पुरूषसत्ताक पद्धतीतल्या उतरंडीत, पुरूष असोत की बायका, निव्वळ प्यादी असतात. जंगलचा कायदा आणि चौकटीबाहेर गेलं की गोळी!
आतमधे खोलवर हे सगळं नासलेलं आहे, या लढाया विचारांनी लढायला हव्या आहेत. आजूबाजूला चार गुण्यागोविंदाने जगणारी आंतरजातीय लग्नं दिसली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं.
या हत्येने आपल्या आवडणार्‍या मुलाशी/मुलीशी लग्न करू इच्छिणार्‍या भवतालच्या शंभरेक मुलामुलींची भावविश्वे उध्वस्त झाली असतील.
उद्या नावडत्या माणसाशी लग्न करून त्यांची कलेवरे जगत राहतील.

************

 कुटूंब / घर ही सुरक्षित जागा आहे, अशा सार्वत्रिक समजाला छेद देणार्‍या ज्या अनेक हिंसाचाराच्या घटना घडत असतात त्यातली ही अत्यंत दु:खदायक घटना आहे.
 मुलीला स्वत:ला आवडलेल्या मुलाशी लग्न करायचा अधिकार नाही, आपलं शरीर वापरायचा अधिकार नाही, तिला स्वत:चं मूल स्वत:च्या मर्जीने जन्माला घालायचा अधिकार नाही, कुठल्या पुरूषाचं मूल वाढवायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार नाही. तिच्या पावित्र्याची चिकित्सा करायला पावलोपावली लोक बसले आहेत.
 पोस्टमार्टेम नंतर ती दोन महिन्यांची गर्भवती होती असे जाहीर केले गेल्यावर, लोकांनी तरीच वगैरे प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली....

**********

यातला महत्त्वाचा धागा मला वाटतो तो असा की आईवडीलांचा आपली मुलं ही आपल्या मालकीची आहेत असाच समज असतो.
आपलं आपल्या मुलांवर विनाअट प्रेम नसतंच. ती स्वतंत्र आहेत, त्यांच्या मर्जीने जगू देत ना, त्यांना! चुकू देत, शिकू देत.

 खलील जिब्रानचं एक काव्य आहे, "तुमची मुलं तुमची नसतात "
Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.

You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.

You are the bows from which your children
as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite,
and He bends you with His might
that His arrows may go swift and far.
Let our bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies,
so He loves also the bow that is stable.

********

Saturday, February 11, 2012

वारीस, एफजीएम आणि आपण -- २


 जहाल स्त्रीवाद्यांची भूमिका टोकाची आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. वारीसची गोष्ट वाचल्यावर पहिल्यांदा मला ती कळू शकली. पुरूष विविध मार्गांनी स्त्रीवर सत्ता प्रस्थापित करतात. हिंसा, ताकद वापरून किंवा प्रेम वापरून. त्यातल्या काहींनी म्हंटलं आम्हांला पुरूषांशी संबंधच नकोत. आमच्या लैंगिक गरजा देखिल आम्ही आपसात भागवू, आम्ही निसर्गाविरूद्ध जावू. वंशसातत्याचं हत्यार कुणी आमच्याविरूद्ध वापरू नये, आम्ही प्रयोगशाळांमधे मुलं तयार करू, थोडे शुक्राणू साठवून ठेवले की झालं! पण या पुरूषांशी आम्हांला कुठल्याही प्रकारचे संबंधच नकोत.
 खरं आहे. शोषणाच्या अशा प्रथा अस्तित्वात असतील तर कुणीतरी अशी टोकाची भूमिका घ्यायला हवीच होती.
..........

 पुरूष ही जमात कायम घाबरतच आली आहे स्त्रिला, तिच्यातल्या नवनिर्मितीच्या क्षमतेला..... स्त्रियांना घाबरून आधीच आपली बाजू सावरण्याचे हे प्रयत्न आहेत. यावरून असं दिसतंय की स्त्रियांच्या लैंगिक क्षमतेलाही पुरूष घाबरताहेत. स्त्री हवी तर आहे, विशेषत: तिचं गर्भाशय हवंच आहे. ते तेव्हढं वापरून घेऊ. आपल्या शरीरसुखासाठी ती आहे, तिला आपण सुखी करू शकू याची खात्री नाही. म्हणून तिच्या अपेक्षाच कापून काढायच्या! कसला न्याय आहे!

  पुरूषांना कधी कळलाच नाही, बायकी समजल्या जाणार्‍या भावनांमधील आनंद! देण्यातला आनंद! त्यांची कीव येते, त्यांना युद्धाचीच भाषा कळते, त्यांच्यासाठी प्रेम, सुख या देखिल जिंकायच्या गोष्टी आहेत! सहकार्य, दुसर्‍याचा आनंद त्यांना कुणी शिकवलाच नाही, ते लढतच असतात मग ते युद्धभूमीवर असोत की शय्यागृहात असोत! बिच्चारे!
 समाजपद्धतीत पुरूषांना वाढवण्यातल्या या चुका आहेत.

 लग्नाच्या पारंपारीक नात्यात दोघांनी एका पातळीवर असण्यातला, मैत्रीतला, चुकतमाकत शिकण्यातला, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्यातला, एकमेकांचं शरीरसुख शोधण्यातला, आनंद जर कळू शकला तर पुरूषही युद्धाचे पवित्रे सोडून देतील.

******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...