Wednesday, July 31, 2013

सहन होत नाही.

http://www.loksatta.com/chaturang-news/jagruti-seva-sanstha-158879/

२७ जुलै च्या चतुरंग पुरवणीत जयश्री काळे यांचा लेख आहे. त्यांच्या जागृती या संस्थेसंबंधी हा लेख आहे.
त्यात त्यांनी त्यांना आलेल्या एका अनुभवबद्दल लिहिलंय.

>>एका घटनेनं आम्ही बरेच दिवस बेचैन होतो. एक अकरा वर्षांची मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे लक्षात आलं. वडील एड्सनी गेले होते तेव्हा आई पॉझिटिव्ह असणार. तिलादेखील मुलीबरोबर औषधोपचार करावे म्हणून बोलावलं तर ती निरोगी! खोदून खोदून चौकशी केली तर कळलं आई स्वत:ला वाचवायला रात्री दारू पिऊन नवरा आला की मुलीला त्याच्यापुढे उभी करत असे! माकडिणीच्या गोष्टीची आठवण झाली!













































***********

Monday, July 15, 2013

कौतुक -- १

एक मैत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटली. गप्पा मारता मारता सहज म्हणाली, " .... घरी मावंदं केलं तर अडीचशे माणसांचा स्वैपाक मी एकटीने केला."
मी अवाक झाले. " का? " तर म्हणाली " हे म्हणाले होते, आचारी लाव. मी करायचा ठरवला आणि केला."
आदल्या दिवशी मुगाचा शिरा करून ठेवला. दुसर्‍या दिवशी फक्त पोळ्यांना बाई लावली. दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, भात..... आक्काने भाजी चिरून दिली. अजून कोणी थोडीफार मदत केलीही असेल पण फोडण्या/ तिखट/ मीठ...... अंदाज... सगळं हिनेच केलं.
म्हणजे नवरा मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक आहे. तिच्या डोळ्यासमोर तिने आचार्‍याला हजार माणसांचा स्वैपाक करताना पाहिले असेल........ तरीही!
 प्रत्येकाची एक मर्यादा असते. मी २५ माणसांचा स्वैपाक एकटी करू शकते, अगदी वेळच पडली तर ५० - ६० त्यापुढे नाहीच.
हिला का करावा वाटला असेल? काय असेल त्यामागे?
कौतुक? कौतुक हवंसं वाटलं असेल?
हं पैसे जरासे वाचले असतील, पण त्यासाठी असेल असं नाही वाटत.
(किंवा हे करणं म्हणजे विसावा असेल, रोजच्या संसारातून मोकळीक.. कोण जाणे. )

कौतुक ही माणसासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.
अगदी मूलभूत गरजांपैकी एक!

प्रत्येक व्यक्तीने आपली एक स्वप्रतिमा घडवलेली असते. शक्यतो ती व्यक्ती आपल्या प्रतिमेला धरून वागत असते.
म्हणजे एखादीने ठरवलं/ तिने तिची प्रतिमा जर अशी घडवलेली असेल की ’मला चार माणसांपेक्षा जास्त लोकांचा स्वैपाक जमतच नाही.’
तर तिला तो जमणारच नाही.

आणि असं असतं की म्हणजे मला वाटतं की माणसाला कौतुक कशाचं हवं असतं तर, त्याच्या स्वप्रतिमेला धरून असेल ते!
म्हणजे मैत्रिणीला २५० माणसांचा स्वैपाक एकटीने केला याचं कौतूक करून घ्यायला खूप आवडलं असेल....
तर दुसरीला कोणी म्हणालं की चार माणसांच्यावर कोणी जेवायला असलं की ही घरी करायच्या फंदात पडतच नाही. तर ते कौतुकच वाटू शकेल.

मला असं म्हणायचंय  ’कष्ट हे गौण असतात किंवा असू शकतात.”

प्रश्न असा आहे की बाईला आपली स्वप्रतिमा घडवताना किंवा खरं तर स्वप्रतिमा घडवण्याची कितपत मोकळीक असते?

"आदर्श" हे समाज घडवत असतो. ते समाजातल्या निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरांत वेगवेगळे असतात.
त्यातले चाकोरीची मोडतोड न करणारे आदर्श स्वीकारले जातात. स्वप्रतिमेवर अर्थातच या आदर्शांचा पगडा असतो.

स्वैपाक करता येण्याचं मूलभूत कौशल्य बाईला आलं पाहिजे असं समजलं जातं. त्यात काहीच्या काही वर जाणार्‍या बाईचं कौतुक होणारच. पण या माझ्या मैत्रिणीला जर म्हंटलं की एकटी प्रवास कर. तर तिला ते जमणार नाही. एकटीने प्रवास करून स्वत:चं कौतुक करून घ्यावं असं तिच्या मनातही येणार नाही.

म्हणजे " २५० माणसांचा स्वैपाक एकटीने करून पाहायचा" हे आव्हान घ्यावसं वाटलं तर घेऊ नये असं नाही.
समजा चाकोरी निवडायची सक्तीच आहे तर आहे त्या चाकोरीतही आव्हानं घ्यावीशी वाटणारच ना!

माझ्या कशाकशाचं कौतुक करा आणि कशाचं नको... हे बाईला ओळखता यायला हवं.
मला सगळंच येईल... च्या मागे जाऊन स्वत:ची फरफट करून घ्यायला नको.

(बाईला बाई म्हणून वाढवणं / घडवणं.. लिंगभाव हा असा सगळ्याच्या मुळाशी आहेच!)

 मुळात जर आदर्श हे लिंगनिरपेक्ष होऊ शकले तर हवं आहे.

बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे ती बदलायची असेल तर आदर्श बदलले पाहिजेत म्हणजे कौतुकासाठी म्हणून काही करायच्या कितीतरी वाटा तिला मोकळ्या होतील.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...