Tuesday, June 12, 2012

वाचकांचे लेख -- आपली आपली एन्जॉयमेंट !!!


हा माझा ह्या ब्लॉग साठीचा पहिलाच लेख आहे... काही चुकलं तर समजून घ्या...

जास्त पाल्हाळ न लावता मुद्द्यावर येते.. माझं असं ऑ  ब्झर्वेशन आहे कि लहानपणापासून जसे स्त्रीच्या मनावर "पुरुषांशिवाय तू कोणीही नाही/ तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही" असे बिंबवले जाते त्याचप्रमाणे "पुरुषांशिवाय मजा/आनंद हा खरा आनंदच नाही" असेही ठसवले जाते... ह्याचाच परिणाम म्हणून पुरुष आपल्या  बायकांशिवायही मजेत पार्टी 
 वगैरे करताना दिसतात.. इकडे तिकडे ट्रीप ला जातांना दिसतात.. पण बायकांना मात्र नवऱ्याशिवाय कुठल्या मौजमजेची कल्पनाही करवत नाही..

बायको घरी नसेल तर खुशाल एकटे-दुकटे सुद्धा हॉटेल मध्ये येऊन जेवणारे अनेकजण आपण पहिले असतील.. पण आज कंटाळा आला म्हणून एकटीच बाई कधी कुठे येऊन जेवतेय असे दिसते का?? अगदी घरात एक दिवसापुरते तिच्यावर अवलंबून असणारे कोणीही नसले तरी..??

पुरुष स्वत:चे मजेमजेचे प्लान्स ठरवतांना बायकांना अगदी सहज गृहीत धरतात.. म्हणजे.. एखाद्या पुरुषाच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये ट्रीप ला  वगैरे  कुठे जायचे ठरले तरी तो अगदी सहज होकार कळवून मोकळा होतो.. बायका मात्र "ह्यांना विचारून/ आईंना विचारून सांगते" अश्या छापाची उत्तरे देतात.. आणि नुसतीच उत्तरे देत नाहीत तर खरोखर परवानगी काढतात.. (आता हा भाग वेगळा कि बऱ्याच जणी "हे सोडत नाहीयेत.. किंवा सासूबाईंना नाही चालणार" याचा बहाणा म्हणून वापर करतात).. पण म्हणून तिला फक्त तिचा विचार करून चालत नाही हे खरे..

माझ्या सासुबाईंची नेहमी तक्रार असते कि त्यांना माझ्या सासरेबुवांनी कधीच कुठे फिरायला वगैरे नेले नाही.. त्यांची फिरण्याची आवड मारून टाकली इत्यादी.. म्हणून मी ठरवले कि आपण त्यांना सध्या प्रसिद्ध असलेल्या एका लेडीज ओन्ली ट्रीप (केसरीची माय फेअर लेडी)ला पाठवू.. तसं मी त्यांना बोलूनही दाखवले.. पण कसचं काय? त्यांना आपल्या नवऱ्याशिवाय कुठे जायचे किंवा कोणती मजा करायची हि कल्पनाच सहन झाली नाही.. त्यांनी मला तसं बोलूनही दाखवले...

एवढेच कश्याला? मला लहानपणापासून कधीच कुठल्या मुक्कामी ट्रीप ला वैगेरे कधी जाऊ दिले नाही घरातून.. कधी विचारले तर उत्तर मिळायचे.." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते".. म्हणजे? मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का?? अर्थात याला अपवाद असणारे पालक आणि सासरकडचे असतीलही जगात.. पण.. मेजोरीटी ह्या अश्या संस्कारांचीच दिसून येते...

अर्थात हेही मान्य आहे कि प्रत्येक वेळी घरच्यांचीच सक्ती असेल असे नाही.. कुठे एकटे जायला.. आपल्यालाच खुपदा  नवऱ्याशिवाय मजा करावीशी वाटत नाही.. पण.. मला वाटते ह्याची मुळे आपल्या इच्छेत कमी आणि आपल्यावरच्या संस्कारात जास्त दडलेली आहेत..

तुम्हाला काय वाटते???

- पियू

Thursday, May 31, 2012

मला असा नवरा हवा

उतनी दूर मत ब्याहना बाबा !

निर्मला पुतुल

बाबा!
मुझे उतनी दूर मत ब्याहना
जहाँ मुझसे मिलने जाने ख़ातिर
घर की बकरियाँ बेचनी पड़े तुम्हे

मत ब्याहना उस देश में
जहाँ आदमी से ज़्यादा
ईश्वर बसते हों

जंगल नदी पहाड़ नहीं हों जहाँ
वहाँ मत कर आना मेरा लगन

वहाँ तो कतई नही
जहाँ की सड़कों पर
मान से भी ज़्यादा तेज़ दौड़ती हों मोटर-गाडियाँ
ऊँचे-ऊँचे मकान
और दुकानें हों बड़ी-बड़ी


उस घर से मत जोड़ना मेरा रिश्ता
जिस घर में बड़ा-सा खुला आँगन न हो
मुर्गे की बाँग पर जहाँ होती ना हो सुबह
और शाम पिछवाडे से जहाँ
पहाडी पर डूबता सूरज ना दिखे ।

मत चुनना ऐसा वर
जो पोचाई और हंडिया में
डूबा रहता हो अक्सर

काहिल निकम्मा हो
माहिर हो मेले से लड़कियाँ उड़ा ले जाने में
ऐसा वर मत चुनना मेरी ख़ातिर

कोई थारी लोटा तो नहीं
कि बाद में जब चाहूँगी बदल लूँगी
अच्छा-ख़राब होने पर

जो बात-बात में
बात करे लाठी-डंडे की
निकाले तीर-धनुष कुल्हाडी
जब चाहे चला जाए बंगाल, आसाम, कश्मीर
ऐसा वर नहीं चाहिए मुझे
और उसके हाथ में मत देना मेरा हाथ
जिसके हाथों ने कभी कोई पेड़ नहीं लगाया
फसलें नहीं उगाई जिन हाथों ने
जिन हाथों ने नहीं दिया कभी किसी का साथ
किसी का बोझ नही उठाया

और तो और
जो हाथ लिखना नहीं जानता हो "ह" से हाथ
उसके हाथ में मत देना कभी मेरा हाथ

ब्याहना तो वहाँ ब्याहना
जहाँ सुबह जाकर
शाम को लौट सको पैदल

मैं कभी दुःख में रोऊँ इस घाट
तो उस घाट नदी में स्नान करते तुम
सुनकर आ सको मेरा करुण विलाप.....

महुआ का लट और
खजूर का गुड़ बनाकर भेज सकूँ सन्देश
तुम्हारी ख़ातिर
उधर से आते-जाते किसी के हाथ
भेज सकूँ कद्दू-कोहडा, खेखसा, बरबट्टी,
समय-समय पर गोगो के लिए भी

मेला हाट जाते-जाते
मिल सके कोई अपना जो
बता सके घर-गाँव का हाल-चाल
चितकबरी गैया के ब्याने की ख़बर
दे सके जो कोई उधर से गुजरते
ऐसी जगह में ब्याहना मुझे

उस देश ब्याहना
जहाँ ईश्वर कम आदमी ज़्यादा रहते हों
बकरी और शेर
एक घाट पर पानी पीते हों जहाँ
वहीं ब्याहना मुझे !

उसी के संग ब्याहना जो
कबूतर के जोड़ और पंडुक पक्षी की तरह
रहे हरदम साथ
घर-बाहर खेतों में काम करने से लेकर
रात सुख-दुःख बाँटने तक

चुनना वर ऐसा
जो बजाता हों बाँसुरी सुरीली
और ढोल-मांदर बजाने में हो पारंगत

बसंत के दिनों में ला सके जो रोज़
मेरे जूड़े की ख़ातिर पलाश के फूल

जिससे खाया नहीं जाए
मेरे भूखे रहने पर
उसी से ब्याहना मुझे ।
++++


कविता छानच आहे.
मला वाटलं जुनी झाली, आजची कविता काहीशी अशी असेल/ असायला हवी.


बाबा,
माझ्या लग्नाची काळजी नका करू ,
मीच शोधीन मला साजेसा जोडीदार,
विश्वास ठेवा माझ्यावर,

मी शोधेन असा नवरा
जो माणसांशी माणसांसारखा वागेल,
प्राण्यांवर, झाडांवर माया करेल

रस्ते, इमारती, दुकाने आणि मोटारी
ही चुकली आहेत का कोणाला?
पण त्याला कधीतरी माझ्याबरोबर
मावळतीचा सूर्य आणि मध्यरात्रीचा चंद्र पाहावासा वाटेल
मोगर्‍याच्या सुगंधाने वेडं होता येईल...

मी असा नवरा शोधेन बाबा,
कविता ऎकायला गेलो ना
की त्याला योग्य ठिकाणी ’वा’ म्हणता येईल
केंव्हा निशब्दता अर्थपूर्ण असते, कळेल त्याला

कळेल त्याला गाण्यातलं माधुर्य 
चित्रातलं सौंदर्य आणि शब्दांचं सामर्थ्य
अशा मैफिलीत जो विसरून जाईल स्वत:ला

विसरून जाईला स्वत:ला मनाजोगं काम करताना
मुलांशी खेळताना, पुस्तकं वाचताना
सगळ्यांमधे असूनही एकटेपणाची जाणीव असेल त्याला

जाणीव असेल त्याला समाजातील नाहीरेंची
स्वत:तल्या, इतरांमधल्या कमतरतांची
माणसांच्या, समाजाच्या मर्यादा तो समजून घेईल

समजून घेईल मला
न सांगता कळत जाईल त्याला मी आतून आतून
तोही मला ओळखता येईल, आतून बाहेरून

मला ना, असा नवरा हवा बाबा!
जो कुठेच नाही आहे, माहीत आहे मला
आईलाही ते समजलेलं होतं.

ज्याच्याशी मी लग्न ठरवीन ना?
त्याच्यात यातलं काहीतरी असेलच.
त्याच्याशी संसार करण्याची हिंमत द्या मला

माणसं तर चांगलीच असतात ना, बाबा
त्यांच्यातलं चांगूलपण शोधायचं, तुम्हीच सांगितलेलं
तरी त्याचं माझं जमलं नाही तर?

लग्न म्हणजे काही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही.
समजा माझी निवड चुकली तर
मी परतून येईन.
तुमच्या गळ्यात पडून आणि आईच्या कुशीत शिरून पोटभर रडेन,
आणि पुन्हा एकदा उभी राहीन.
तुम्ही फक्त माझ्याबरोबर असा.
आणि हो, माझी काळजी नका करू.
विश्वास ठेवा माझ्यावर


-- विद्या

Tuesday, May 15, 2012

कुटूंबप्रमुख - १


 काही कामासाठी आम्ही डेक्कनवरच्या एका मोठ्या दुकानात गेलो होतो. ज्या लोकांना काही खरेदी करायची होती ते काउंटरपाशी उभे होते. एका बाजूला सोफा होता, कुणाला बसायचे असेल तर, बसा. त्या गुबगुबीत सोफ्यात एक माणूस , साधारण पंचेचाळीशीतला, आरामात, घरात बसल्यासारखा हातपाय पसरून बसला होता. साहजिकच माझे त्याच्याकडे लक्ष गेले. जरा वेळाने एक बाई त्याच्याजवळ आली,  ती त्या माणसासाठी दुकानातल्या फिल्टरमधून पाणी घेऊन आली होती, तिने ग्लास त्याला दिला, पाणी पिऊन झाल्यावर त्याने रिकामा ग्लास तिच्या हातात दिला, ती ग्लास जागेवर ठेवून आली आणि त्याच्याशेजारी बसली. नंतरच्या त्यांच्या आपसातल्या बोलण्यातून कळले ते असे की ती बाई त्या माणसाची बायको आहे, सोबत कॉलेजमधला मुलगाही आलेला होता, मुलासाठी लॅपटॉप घ्यायला ते कुटूंब आले होते.
 घरी-दारी, सगळीकडेच, बायको म्हणजे, एक हरकाम्या, गुलाम घेऊन फिरतात की काय हे लोक? बाहेर दुकानात देखील, स्वत:चं पाणी स्वत: उठून घेऊ शकत नाहीत? तो माणूस मुलाला म्हणाला , " जा काय त्या लॅपटॉपच्या माहित्या घेऊन ये. मला सांग" दुकानात आल्यावर काउंटरपाशी उभं राहून त्याला कुठली चौकशी करायची नव्हती. मुलगा ती करणार मग सोफ्यात बसलेल्या बापाला हे येऊन सांगणार, मग कदाचित हे महाशय उठणार.... कोण जाणे.
आमचे काम झाले. आम्ही निघालो.
*******
कुटूंबप्रमुखाचं काय नातं असतं त्याच्या कुंटूंबातल्या व्यक्तींशी? वरचं दृश्य माझ्या डोळ्यांना (आणि मनाला) त्रास देऊन गेलं. मागच्या पिढीत हे सरसकट असणार.
 एक वरीष्ठ बाकी सगळे कनिष्ठ, एक आज्ञा देणार बाकीच्यांनी पाळायची, असं का असावं? यात एक लक्षात घ्या, इथे दोन्ही बाजूंनी तक्रार नाही.
तुम्ही म्हणाल, " पाच-सात मिनिटांच्या निरीक्षणावरून एखाद्या कुटूंबाबद्दल असे निष्कर्ष खात्रीने कसे काढता येतील?
मान्य आहे.
पण या निमित्ताने, या गोष्टींचा विचार तर करू या.

पहिल्यांदा घराघरात लोकशाही आली पाहिजे.
तुमच्या घरात लोकशाही आहे?

********

Monday, April 30, 2012

बायका आणि त्यांची कामे -- २




यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन यांची फारकत करू नये, त्याने प्रत्येकाचीच ओढाताण होते, त्यातल्या त्यात बाईची जास्त होते.
 यातली गोची अशी आहे की जर आपण नोकरीच्या ठिकाणी, घरच्या जबाबदार्‍या असल्यामुळे बाईला सवलत द्यायला लागलो तर घर व्यवस्थापन सांभाळणे हे तिचेच काम आहे, हे पक्के होत जाईल, अधिकृतरित्या आपण ते मान्य करतो आहोत असे होईल, मग पुरूष ही जबाबदारी घेणारच नाहीत, तसे व्हायला नको आहे. घर चालवणे ही दोघांचीही जबाबदारी आहे, त्यासाठी काहीवेळा पुरूषांनांही सवलती दिल्या/ घेतल्या जाव्यात. घर सांभाळणे, माणसे सांभाळणे, हे काही दुय्यम काम नाही, हे ठसत जायला हवे आहे.


 श्रीराज,
 निसर्गाने जेवढा भेद केला आहे, तेव्ह्ढ्यापुरत्याच सवलती बाईला मिळाव्यात. गरोदरपण आणि अपत्याला जन्माला घालणे ही कामे निसर्गाने बाईवर सोपवलेली आहेत, पण तेव्हढीच, मूल सांभाळणे, मूल वाढवणे ही कामे निसर्गाने केवळ बाईची गणलेली नाहीत, ती कामे पुरूषांनीही करायला हवीत.

 दीपा,
>>घर/मुलं संभाळणं याला काय अक्कल लागते?,
 असा सूर असेल तर घरातल्या बाईने तसं नसतं हे दाखवून द्यायला हवं. ते अवघड असतं.
>>समाजाला दाखवायला,चारचौघांच्यात मिरवायला या पुरुषांना शिकलेल्या बायका लागतात.पण तिने स्वत:चे काही आवडीचे करायचे म्हणाले तर घर ,मुलं संभाळून काही करायचे असेल तर करायचे अश्या मताचे पुरुष आज घरोघरी दीसतात.
घरोघरी नसतील, पण दिसतात. बायकांनीही वस्तू होणं नाकारायला हवं

अपर्णा,
 तुझ्यासारखं, एक पाऊल मागे घेणं हे काही काही पुरूषही करतात,
 >>माझी मुलं, त्यांना वेळ देणं हेही माझंच काम आहे आणि त्यातल्या अचिव्हमेंटमधला माझा आनंद कुणीही समजू/हिरावू शकणार नाही...:)
 हे केवळ बाईनेच का म्हणायचं? अपवादात्मक पण पुरूषही हे म्हणू लागले आहेत. ते स्वागतार्ह आहे.
 खरं म्हणजे तू जसा तुझा आनंद शोधू शकते आहेस, तसा प्रत्येकाला शोधता यायला हवा.

अश्विनी,
 >> त्यामुळे अर्थार्जनाच्या क्षेत्रात कामाच्या वेळा, हक्काच्या रजा, सवलती या बाबतीत, घरातल्या कामांची कोणतीही जबाबदारी नसलेला पुरुष हाच प्रमाण मानला गेला आहे.
 खरं आहे.
>> कामावर पोचायला एखादीला उशीर होत असेल तर बाकीच्यांनी ते समजून घेतले पाहिजे?
 होय. म्हणजे दरवेळीच नाही, तिची कारणं जाणून घेऊन, तेच एखाद्या पुरूषासाठीही, व्यवस्थापनाचे कामगारांच्या घरगुती/ खाजगी बाबींशी आपल्याला काही देणे घेणे नाही, असे धोरण असू नये.

>>अर्थार्जनासाठी घरदार वाऱ्यावर सोडून द्यायला लावणारी ही व्यवस्था बदलणं, 'घर, मूल ही बाईचीच जबाबदारी' या आपल्या गृहीतकात बदल झाल्याशिवाय अशक्यच आहे. पुरुषांसाठी हे गृहीतक फार सोयीचं असल्यानं त्यांच्याकडून अशा बदलाची अपेक्षा ठेवणं हे तर अनैसर्गिकच वाटावं अशी परिस्थिती अजूनही आहे. पण हळूहळू का होईना, हे बदल घडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि तसे प्रयत्नही करूया.
अनुमोदन!

मोहिनी,
 >> सांसारिक अडचणींचा विचार करता कायम सवलती घेण्याकडे स्त्रियांचा कल नाईलाजाने वाढत जातो.
 खरं आहे

 >> लग्न करणे-न करणे, मूल जन्माला घालणे-न घालणे हे सामाजिक नव्हे तर वैयक्तिक प्रश्न आहेत,
  वरवर हे मान्य होण्यासारखेच आहे. पण तसं नसतं. बाई मूल जन्माला घातते त्यावेळी पुढची पिढी जन्माला घालत असते, समाज पुढे नेत असते. हे सामाजिक प्रश्नही आहेत. म्हणून तर एक किंवा दोन मुले पुरेत ची घोषणा होते, मुलींचे प्रमाण मुलग्यांच्या तुलनेत कमी होत आहे त्यामुळे कितीतरी सामाजिक समस्या उभ्या राहिल्या आहेत.

>>  स्त्रियांना बाहेरील कामाच्या जागी वेळेच्या आणि उत्पादनक्षमतेच्या (घरी १००% द्यावेच लागत असल्याने) मर्यादा आहेत त्यामुळे त्यांनी त्या स्वीकारून समान वेतनाचा आग्रह धरू नये असे मला वाटते. जिला तसे वाटते तिने घर आणि करियर यांना स्वतंत्र पारड्यात ठेवावे.
  हा खूप पुरूषी दृष्टीकोन आहे. घर/मुलं सांभाळणे ही बाईचीच जबाबदारी आहे, या गृहितकाला धक्का लावला पाहिजे.

Sunday, April 15, 2012

बायका आणि त्यांची कामे


स्त्री आणि पुरूषाला समान कामाला समान वेतन असायला हवे. मग स्त्रीने कामात कुठल्याही सवलती मागू नयेत, असेच माझे मत होते. अगदी गरोदरपणात देखील...

मुक्ताच्या वेळी मी नाशिकला एकलहर्‍याच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात होते. मी प्रेग्नंट आहे, या कारणासाठी कुठलीही सवलत कधी मागीतली नाही. तीन तीन मजले, लोखंडी जिन्याचे चढून जायचे, तिथला प्रचंड आवाज, बॉयलर रुमजवळ असो, जनरेटर्स जवळ असो की ऍश हॅन्डलिंग प्लान्ट असो की आणखी कुठे असो, मी जात असे, मला वाटे, मूल जन्माला घालणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, माझ्या नोकरीशी त्याचा काही संबंध नाही, नोकरीत मी १००% द्यायलाच हवेत. आठवा महिना संपेपर्यंत मी हे सगळं करत होते, मला कधी माझ्या शरीराची लाज वाटली नाही की कामाची नाही.

 आता माझं मत बदललं आहे. आम्हांला हे शिकायला होतं.

 आपल्याला खाजगी जीवन आणि व्यावसायिक जीवन यांची अशी फारकत करता येणार नाही. घरात आणि नोकरीच्या ठिकाणी असा माणूस विखुरलेला असू शकत नाही, तसं केलं की बायकांवर त्याचा ताण जास्त येतो. कारण नोकरीच्या ठिकाणी जशी कामाची समानता असते/असू शकते, तशी ती घरी असत नाही. बायकांचं कर्तृत्व केवळ त्यांच्या व्यावसायिक यशावर मोजलं जात नाही, तर त्यांनी घर कसं सांभाळलं, मुलांना कसं वाढवलं, हे प्रामुख्याने बघितलं जातं. ते बाईचंच काम समजलं जातं. साधं मुलाला ताप आला तर काय करायचं, रजा घ्यायची की अन्य काही व्यवस्था करायची हे बाईलाच बघायला लागतं, घरी एकशे दहा टक्के देऊन कामाच्या ठिकाणी तिने शंभर टक्के दिलंच पाहिजे असं अपेक्षिलं जातं. याकडे आपण डोळेझाक करणार का?

 मूल जन्माला घालणं ही जरी खाजगी बाब असली, तरी ते मूल समाजासाठीच असतं ना? बाई पुढची पिढी जन्माला घालत असते ना? मग या काळात जर तिला सवलती मिळाल्या तर कुठे बिघडलं?  किंवा मिळायलाच हव्यात.

 पूर्वी स्त्रीवादी स्त्रिया म्हणायच्या की आम्ही पुरूषांच्या बरोबरीच्या आहोत, कुठलंही काम आम्ही त्यांच्यासारखं करू शकतो आम्हांला समानता हवी. आता स्त्रियांना कळलंय, त्या म्हणताहेत, आम्ही स्त्रिया आहोत, आम्हांला पुरूष व्हायचं नाहीये. आमच्या बाईपणासह आम्ही अभिमानाने उभ्या राहू, त्यासह आम्हांला समानता हवी.

******
 प्रोटेस्टंटांनी पहिल्यांदा work is worship ही संकल्पना आणली. म्हणजे रोज किंवा दर रविवारी चर्चमधे गेलंच पाहिजे असं नाही, तुम्ही तुमचं काम जीव ओतून केलंत, मन लावून केलंत की ते ईश्वराजवळ पोचतं.
 त्यामुळे ’कामाशी बांधीलकी’ हा एक प्रतिष्ठेचा विचार झाला आहे.

 बाईसाठी घर / मुलं सांभाळणं हे नैतिकदृष्ट्या अधिक वरचढ काम समजलं जातं. त्यामुळे तिच्याकडून त्या कामाला प्राथमिकता दिली जाते.
आणि घरं आणि मुलं सांभाळणं हे काम कोणीतरी तर करायलाच हवं आहे.

 कामावर पोचायला उशीर होणार्‍या कर्मचार्‍यांत मुख्यत्वे बायका असतात, त्याच्या कारणांचा अभ्यास केला असता असं बाहेर आलं की बहुतेक सगळ्या बायकांना घरचं सारं आवरूनच घराबाहेर पडायला लागतं, तर बहुतेक सगळे पुरूष फक्त स्वत:चं आवरतात आणि घराबाहेर पडतात.

******

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...