Showing posts with label वाचकांचे लेख. Show all posts
Showing posts with label वाचकांचे लेख. Show all posts

Tuesday, March 8, 2016

स्वयंपाक कला

सगळी रोजची , दैनदिन कामे आटपून जरा chatting करत होते, तर मागून लगेच मुलाची, 

आरुषची, हाक, आई -आई , भूक लागली, काही तरी खायला दे! त्याला म्हंटले अरे काय देऊ,भाजी-पोळी, 

कि वरण-भात, कि fruits देवू चिरून तर quick  reply … no. असे ओरडला. काही तरी tasty दे. जर 

प्रश्न च पडला . रोज रोज काय नवीन द्यावे आणि tasty. मग परत एकदा internet गुरु ला साकडे 

घातले. मग त्याला हवा तो पदार्थ करून दिला. त्याने आवडी ने yummy  म्हणता  खाल्ला . आरुष हि 

खूष …. मी ही खुष ! 

       मला खरेंतर लग्नाआधी कधी स्वयंपाकाची विशेष जवाबदारी पडली नव्हती, कारण माझी आई 

गृहिणी होती. आणि माझ्या आईने पण कधी अभ्यास सोडून घरकाम - स्वयंपाक करणे याच आग्रह धरला 

नाही. Rather आमच्या घरी, म्हणजे माहेरी, माझ्यात आणि माझ्या भावात कधी भेदभाव केला नाही. 

अगदी लग्न होईपर्यंत सगळा काळ अगदी सुखात गेला. आधी शिक्षण, मग career यातच वेळ गेला. 

आणि मग पडल्या डोक्यावर अक्षता. लग्नानंतर एकदम Germany च! मग मात्र थोडं -थोडं tension 

यायला लागलं. म्हणजे रोजचा थोडाफार स्वयंपाक येत असे. पण ते रोजचेच. अगदी शिरा-उपमा असे 

साधेच पदार्थ असले तरी मला ते करायचं म्हटलं तरी tension यायचे. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा 

आम्ही Siegen येथे राहत होतो. इतर cities पेक्षा जर लहान गाव. अगदी पहिले एक वर्ष तर मी पण 

ब्रेड खाऊन घालवलं. आणि काही ठराविक भाज्या म्हणजे बटाटा, फ्लोवर, मोठ्ठ वांगं, फरसबी, छोले-

राजमा चे tins बस्स एवढंच. सोबत भात आणि ब्रेड. ह्या सगळ्या भाज्या करायची माझी आधीची पद्धत 

म्हणजे फोडणी करणे, त्यात भाजी टाकणे, तिखट-मीठ -मसाला आणि भरपूर पाणी. भाजी शिजेपर्यंत 

बघत राहायचं. शिजली की hot-plate बंद. ह्या प्रकरणाशी hot-plate शी जुळवता जुळवता माझ्या नाकी 

नऊ आले. बर नवरा पण मी जे करायचे ते गुपचूप खयच. बहुतेक त्यालाही हीच पद्धत येत होती. मग 

अशातच नवऱ्याने, तुषारने, सांगितले, दिवाळीत आपल्या घरी माझ्या मित्रांना बोलावयाचे आहे. मला 

आनंद झाला, पण एवढा १०-१२ जणांचा करायचे tension पण आले. पण दोघांनी मिळून menue 

ठरवला, स्वयंपाक पण दोघांनी मिळून केला. आणि सगळ्यांनी चवीने खाल्ले. बस मग काय? माझा 

confidence वाढला आणि हळूहळू सवयीने hot-plate शी सुत जुळू लागले. इथे जे पदार्थ मिळतात, 

त्यांनाच आपल्या भारतीय पद्धतीने बनविणे जमू लागले. काही दिवसांनी मी एका मुलाची आई शले. 

आणि खरंच हो… "गरज ही शोधाची जननी असते" हे जननी झाल्यावरच मला पटले. मग त्याच्यासाठी 

करताना मीही नविन-नविन पाककृती शिकत गेले. अगदी "कोंड्यापासून मांडा" करणे जे कौशल्यही 

आत्मसात केले. मग आता "सुगरण" अगदीच नाही, पण आता मी कोणताही पदार्थ करून शकते. आणि 

मग इथे abroad ला राहायचा एक मोठ्ठा फायदा म्हणजे अगदी ५० माणसांचा स्वयंपाक करणे, योग्य 

अंदाज बांधणे, कितीला किती प्रमाण हे अगदी नजरेनेच कळू लागले. कोणत्या पदार्थाला काय लागेल? 

किती लागेल? हे आपोवापाच कळायला लागले. Proper management नी आपण  अगदी एकटी, 

कोणाच्या मदतीशिवाय सगळे करू शकतो असा आत्मविश्वास मला आता आहे. हे सगळे स्वयंपाक 

प्रशिक्षण मला माझ्या Germany मधील वास्तव्यने दिले. माझे बाबा जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा 

त्यांना अगदी  खूप कौतुक वाटले, मी उत्तम स्वयंपाक करते आहे हे पाहून. 

काही दिवसांनी तुषारने २ वर्षांकरता Indore ला जायचे ठरवले… आम्ही २ वर्षे इंदौरला वास्तव्यास होतो. 

आणि मग  थेट खवय्यांच्या शहरात आगमन. इंदौरनी पण मला खूप काही दिले. खूप जीवा-भावाच्या 

मैत्रिणी, सक्खे शेजारी. आम्ही राहत होतो ती colony एक कुटुंबच झाले. इथे तर जिभेला आणि 

त्याचबरोबर माझ्या पाककलेला खूप छान exposure मिळाले. मी अजून स्वयंपाकाच्या क्लुप्त्या शिकले. 

इंदौरला पण भिशी पार्टी, मुलाची B´day party, हळदी-कुंकू समारंभ यात माझ्या पदार्थाचे होत असलेले 

कौतुक आणि एकटीने करण्याचे कौशल्य (इथे मदतनीस किंवा घरकाम करणाऱ्या मावशींशिवाय बरे) याला 

मिळालेली दाद तर अविस्मारणीयाच. मग आम्ही पुन्हा एकदा Siegen ला परत आलो. आता मात्र इथे 

सुखद धक्का मिळाला, एक तर आता इथे Indian grocery आधीपेक्षा जास्त मिळू लागली. पिठे, भाज्या 

पण. शिवाय by post भारतातून हवे ते सगळे मागवता येवू लगले. त्यामुळे आता खूप सुसह्य वाटत 

    खरच खाणे किंवा जेवण हे अगदी आपल्या जीवनातील अगदी अपरिहार्य बाजू. सकाळी उठल्यापासून 

ते झोपेपर्यंत सतत वेग-वेगळ्या चवीचे खायला लागते. त्यामुळेच कि काय हल्ली प्रत्येक TV  channel 

वर विविध  भाषेत अगदी मराठी त  सुद्धा एक तरी cookery  शो अस्तोच. आणि बरे का? ह्या सर्व 

shwos ना TRP भरपूर  मिळतो, असा ऐकले आहे. विविध bolgs पण हल्ली दिसतात.

     असाच माझा हा स्वयंपाक कलेचा प्रवास unlimited आणि non-shop सुरूच राहील आणि 

दिवसेंदिवस समृद्ध होईल… 

--  अनघा संत

Siegen, Germany  

Sunday, July 12, 2015

जोक??

काही दिवसांपूर्वी व्हॉटसॅपवरच्या एका ग्रुपवर एक जोक शेअर केला गेला. एका मुलानी फ़ॉरवर्ड केलेला तो जोक असा होता,
दोन बायका बुद्धिबळ खेळत असतात.....
           :
           :
:
:
                 :
                 :
खाली कशाला आलात, जोक वरतीच संपला!
   लगेच त्यावर ठरलेले ‘डोळ्या्तून हसून हसून पाणी येणारे’ ते स्माईली पाठवले गेले. त्या क्षणी डोक्यात सणक गेली आणि त्या मुलाला विचारावं वाटलं, हे असे जोक पाठवून तुम्ही मुलींची टिंगल करता - त्यांना ह्युमिलिएट करता असं नाही वाटत का? त्यावरचा त्याचा रिप्लाय कळस गाठणारा होता.
"सत्यं नेहमी कटु असतं."
सत्यं? ‘बायका बिनडोक असतात, उगाच न झेपणारी बौद्धिक कामं न करता त्यांनी चूपचाप घर सांभाळावे’, या मानसिकतेचीच ही पुढच्या काळातली आवृत्ती असं वाटून मी त्याला प्रत्युत्तर द्यायचंच हे ठरवलं आणि लिहीलं,
"अजूनही मुलींना कमी लेखण्याची मानसिकता आहे आणि आपली आत्ताची पिढी पण तीच मानसिकता अंगी बाणवते, हे तू दाखवून दिलंस, धन्यवाद."
त्यावर धडाधड मेसेजेस येऊ लागले,
"Chill yar, it's just a joke" वगैरे.....
आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे मेसेज मुख्यत: ग्रुपमधल्या मुलींकडूनच आले. म्हणजे ज्यांच्या वतीने मी बाजू मांडतीये, वाद घालतीये, त्याच मला पाठिंबा द्यायच्या ऐवजी मला ‘Chill’ करायचा प्रयत्न करतायत! हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.....ज्या मुद्द्यावर सर्व स्त्रियांनी (आणि बाकीही सद्सद्विवेक जागृत असणा-या लोकांनी) एकत्र यायला हवं, त्याऐवजी या मुद्द्यावर बोलणा-यांचेच पाय ओढले जात आहेत....
   थोड्या वेळानी त्या मुलाचा परत मेसेज, "ह्या जोकमध्ये बायका असा उल्लेख केलाय, आणि तुम्ही अजूनही मुली आहात."
यावर लगेच बाकीच्यांचे पाठिंबादर्शक रिप्लाय, "पॉईंट आहे" वगैरे.....  आता या सारवासारव करणा-या मेसेज मध्येही लोकांना काय ‘पॉईंट’ दिसला काय माहित.....उगाच एकाची बाजू लावून धरण्यासाठी आंधळेपणानी फ़क्त ‘री’ ओढायची....
      बायका असो वा मुली, शेवटी हा विनोद ‘स्त्री’ वरच केला गेला होता ना....आत्ता जरी हा फक्त एक ‘विनोद’ वाटत असला, तरी तो अनेक ग्रुप्सवर फॉरवर्ड होणार - त्यावर लोकं ‘जोक’ म्हणून हसणार...आणि न कळत अशीच मानसिकता एखाद्या व्हायरस सारखी समाजात भिनत जाणार. ज्या मुलींनी हा फक्त एक ‘जोक’ म्हणून सोडून दिला, त्याकडे फार काही गांभीर्याने पाहिले नाही, त्या मुलींना उद्देशून मला असे लिहावेसे वाटते की, ‘it's just a joke’ इतक्या casually घेऊन आणि त्याकडे दुर्लक्ष करून आपण एक प्रकारे त्याला प्रोत्साहन किंवा छुपा पाठिंबाच दाखवत नाही का? अशाच जोकसारख्या छोट्या छोट्या बिनमहत्वाच्या वाटणा-या गोष्टींमुळेच आज २१ व्या शतकातही ‘स्त्री’ ची प्रतिमा तशीच राहिलेली आहे. बाह्यत: जरी स्त्री-पु्रूष समभाव वगैरे दिसत असला तरी समाजातील ‘स्त्री’ बद्दलची मानसिकता, तिची प्रतिमा तसूभरही बदललेली नाही. फक्त तिची जागा दाखवण्याच्या, कमी लेखण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.....असं असताना आज या विनोदाकडे कानाडॊळा करून चालेल का?
      त्यावर काही जणांचं म्हणणं असं की आपल्या ग्रुपचा समाज तेवढा सुशिक्षित आहे की तो मुलींचा मान राखेल.......‘सुशिक्षित?’ नुसतं उच्चशिक्षण घेतलेले, पण अशी मानसिकता असलेले लोक ‘सुशिक्षित’ कसे? असा मला प्रश्न पडतो. आणि जर तुम्ही म्हणता की हा समाज मुलींचा मान राखण्याइतका ‘समंजस’ वगैरे आहे, तर असे जोक्स शेअर तरी कसे केले जातात?
त्यानंतर एक-दोन दिवसातच त्या मुलाचा आणखी एक मेसेज आला, ‘मुलापेक्षा मुलगी कशी चांगली-महान’ अशा अर्थाचा तो मेसेज होता आणि खाली लिहीलं होतं, माझ्या जोक वर रूष्ट झालेल्यांसाठी खास....
खरं तर हे ही अपेक्षित नव्हतं मला..... ‘स्त्री’ ला काय हवंय, फक्त बरोबरीचा दर्जा. उगाच देवीच्या स्थानावर बसवलेलंही नकोय. कारण त्यामुळे तिचा चुकण्याचा अधिकारच तुम्ही नाकारताय....या दोन टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा ‘स्त्री’ ला माणूस म्हणूनच वागवा असं मनापासून सांगावसं वाटतं....
     सर्वात महत्वाचं म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं किंवा समोर जे चुकीचं घडतंय त्याला विरोध न करता गप्पं बसणं हे आधी आपण थांबवलं पाहिजे. म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दु:खं नाही, काळ सोकावतो......आपण विरोध दर्शवला, किमान आपली बाजू, आपलं म्हणणं नीट पोहोचवू शकलो, तरीही खूप सुधारणा होऊ शकेल, असं वाटतं.

--- गौतमी

Thursday, September 26, 2013

स्त्री हीच स्त्रीची शत्रू?? किती खरं.. किती खोटं..

"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय यांच्यात अगदी निखळ मैत्रीचे/ सुखद नाते अगदी अभावानेच आढळून येते.

का बंर असेल असं?? स्त्रिया ह्या काय जन्मजात हेवेदावे आणि मत्सराच्या मुर्त्या असतात का??

आणि खूप विचार केल्यावर कळले.. याची मुळे सुद्धा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतच दडलेली आहेत.

१) सासू-सून:

सासूने जनरली मागच्या पिढीतली असल्याने आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त सहन केलेले असते. पुरुषप्रधान सत्ता घरात कडक शिस्तीची असेल तर तिने आयुष्यभर दुय्यम स्थान अनुभवलेले असते. ना तिच्या विचारांची किंमत केली जात ना ती दिवसभर करत असलेल्या कामांची.. त्यामुळे वैतागलेल्या आणि काही अंशी पिचलेल्या अश्या बाईच्या मुलाचे जेव्हा लग्न होते तेव्हा समाज तिच्या हातात सून नावाचे एक सोफ्ट टार्गेट देतो. आयुष्यभर कुणाचे ना कुणाचे बॉसिंग सहन केलेल्या या बाईच्या हातात तिचे ऐकेल (रादर जिला तिचे ऐकावेच लागेल), असं एक(मेव) माणूस मिळत (हो.. एकमेवच.. बाईची सासू झाली म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेले पुरुष तिच्या मताला ह्या वयातही मान देतातच असं नाही.. त्यांना मुळी सवयच नसते ना तशी).  थोडक्यात सांगायचे तर पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडून अजून तरी घरातल्या स्त्रीला इतर कोणावर वचक ठेवता येत नाही आणि मग ती सुनेवर सत्ता चालवायला लागते.. तिला आपल्या मनाप्रमाणे वागवू पाहते.. तिच्याकडून तिच्या सासूने जबरदस्तीने करून घेतलेली सेवा/ मानपान हे ती विसरली नसते (ते विसरणे शक्यच नसते.. पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न होत असत..आणि अश्या वयात त्यांच्या सासूकडून त्यांचा झालेला छळ हा त्यांच्या कोवळ्या मनावर मोठाच आघात होता.. त्यामुळे तो आयुष्यभर लक्षात राहिलेला असतो). तीही तसेच करून घ्यायचा प्रयत्न करते. नव्या पिढीच्या सुनेला हे विचार पटत नाहीत. आणि (आताच्या पिढीच्या) तिच्या शिक्षणामुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिला जे पटत नाही ते ती मुळीच करत नाही. मग अर्थातच भांडण/ वादावादी होते आणि मग दोघी एकमेकींच्या शत्रू बनतात.

२) जावा-जावा:

यांच्यातील वादाची कारणे घरातले पुरुष कोणाला (जरातरी) मान देतात किंवा घरच्या मोठ्या निर्णयात (बायकांसाठी मोठा निर्णय म्हणजे लग्नात कुणाला काय आणि किती आहेर करायचा इत्यादी) कुणाचे मत विचारात घेतात ह्या स्थानासाठी झगडा हे होय. हे झाले एकत्र कुटुंब पद्धतीत.. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीतसुद्धा सासू-सासरे कॉमन असतात. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे वागणाऱ्या एकीला एक आणि स्वत:च्या मताला महत्व देणारया.. (थोडक्यात जराश्या आधुनिक) अश्या सुनेला वेगळी वागणूक दिली कि उगीचच एकीच्या मनात दुसरीविषयी क्लीमिष तयार होते. काही वेळेला नवरेच उगाचच "वहिनी बघ कशी घरासाठी राबत असते.. तिची सर तुला येणारेका?" अशी काडी सारून देतात.. आणि मग भडका उडतो.

३) नणंद-भावजय:

ह्या केस मध्ये आपल्यावर प्रेम करणारा भाऊ/ बाबा आता घरात नवीन आलेल्या मुलीला हे प्रेम/ तो मान (हा मान म्हणजे फार काही नसतो.. फार तर ती पडद्यांचे किंवा घराला मारायचे रंग ठरवते) मिळतो आहे हे घरातून आता गेलेल्या मुलीला पटत नाही. माहेरचे आपले स्थान अबाधित ठेवायसाठी ती उगाचच माहेरच्या गोष्टीत ढवळा-ढवळ करत राहते. आणि सुनेला याचा राग येतो. त्यातच "दुरून डोंगर साजरे" या न्यायाने घरातल्या मुलीला आपली सासू आपला खूप छळ करते आणि आपली आई मात्र आपल्या वहिनीचे खूप लाड करते आहे असा काहीतरी समज होतो. काही वेळेला हे प्रकरण "वहिनी माझ्या आईचं नीट करत नाही.. तिला हवा-नको तो मान देत नाही" इथपर्यंत विचारांची मजल जाते.. आणि मग मत्सर आणि शत्रुत्व..

अर्थात हे चित्र आता बदलते आहे. आपल्या सासूने आपला छळ केला म्हणून आपणही आपल्या सुनेचा छळ करायचा हि प्रवृत्ती सगळीकडेच असेल असं नाही. काहीवेळा अगदी क्वचित का होईना पण आपण जे सोसले ते आपल्या सुनेला भोगायला लागू नये अशीही इच्छा दिसते. पण क्वचितच.. कारण पुरुषसत्ताक सिस्टीम हि स्त्रीला 'कधी ना कधी आपणही एक दिवस सासू होऊ आणि ह्या संसाराच्या रगाड्यातून सुटका होईल' ह्या आशेच्या गाजरावरच जगवत असते.. ती तरी सहजपणे आपलं सासूपण कशी बर विसरेन??

तरीदेखील पूर्वीच्या परंपरांप्रमाणे हा काही विशिष्ठ नात्यांमधली तेढ आणि दुस्वास पण अजूनही खालच्या पिढीत कुठेतरी झिरपतो आहे याची अजूनही अध्येमध्ये जाणीव होते.
आपण कितीही मैत्रीचे नाते निर्माण करायचे म्हटले तरी काही नात्यांच्या बाबतीत समाज आपल्याला तसं करू देत नाही.. मला आठवतंय.. लग्नानंतर सुरुवातीला माझी सासू मला फार काम करू द्यायची नाही. घरच्या लाडक्या मुलीसारखी मी घरभर बागडत असायची नुसती.. तेव्हा अनेकांनी येऊन "सुनेला फार डोक्यावर बसवून घेऊ नका ह..नंतर डोक्यावर मिरया वाटायची" असे सल्ले अगदी माझ्यासमोर दिलेले आहेत". म्हणजेच स्त्रियांनी शत्रुत्वाच्या चक्रातून एखाद्या नात्याची सुटका करू पाहिली.. तरी समाजाला ते बघवत नाही.. अमुक नात्यातल्या माणसांनी एकमेकांशी अमुक पद्धतीने वागले पाहिजे हे सुद्धा समाजच ठरवू पाहतो.. हा असला कसला समाजाचा जाच/ कसली जबरदस्ती??

कधीकधी विचार केला तर वाटते.. "फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे. स्त्रियांमध्ये असुरक्षितता बिंबवण्यामागे ह्या समाजाचा मोठाच हात आहे.

म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.

Saturday, August 3, 2013

ओझं म्हणजे काय?



ओझं म्हणजे काय? चौकटीतील बंधन? टाळता न येणारी जबाबदारी? का हे सर्वच आणि अजून काही? मला वाटतं ओझं म्हणजे दडपण. मी जेव्हा दुसर्‍याच कुणाच्या, मग ती व्यक्ती असो वा समाज, दडपणाखाली एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या गोष्टीचे ओझे होऊन बसते माझ्यासाठी.

मी काही चौकटीत वाढलो. काळानुसार, वयानुसार, कुवतीनुसार काही चौकटी बदलल्या; ज्या मला पटल्या त्या मी स्वीकारल्या; ज्या नाही पटल्या त्या मोडायचा (माझ्या परीने) प्रयत्न केला. 

लहान असताना मला हातावर मेंदी काढून घ्यायला आवडायची; पण शाळेत मित्रांचा गट जमण्याच्या वयात आलो आणि हातावर मेंदी परत उमटलीच नाही. साधं कविता आवडणं, गांधी-विनोबा ह्यांच्याबद्दल आदर बाळगणे अशा गोष्टी ह्या कुचेष्टांचा विषय ठरू शकतो ह्याचा अनुभव घेतला.  ‘फक्त मुलांच्या‘ शाळेत शिकताना नाटकात आनंदीबाईंचे काम केल्यामुळे किती हेटाळणी होऊ शकते ह्याची कल्पना करणं बर्‍याच जणांना अवघड जाईल. किशोरवयातील शालेय वर्षात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचे खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो असे आता जाणवते.
पुरूषाने रफ-टफ, माचो असलं पाहीजे ह्या ठाम समजुतीपायी पुरूषच एखाद्या पुरूषाची प्रचंड मनहानी करू शकतात. आता मेंदी काढावीशी वाटली तर मी जरूर ती हातावर उघडपणे मिरवीन. पण इतक्या वर्षानंतर आता मेंदी काढून घ्यावी ही इच्छाच राहिली नाही.

मी जसा जन्माला आलो त्या जातीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या काही रूढी, परंपरा होत्या ज्या मी पाळणे अपेक्षित होते. जेव्हापासून कळत्या, किंवा कमवत्या, वयात आलो तेव्हापासून ज्या रूढी मला पटल्या नाहीत त्या मी पाळत नाही...प्रसंगी इतरांचा रोष पत्करून. मी नास्तिक मनुष्य आहे. धार्मिक परंपरा पटत नसताना पाळणे मला मान्य नाही. साधं घरातल्या इतरांबरोबर उपवास पाळणे ह्या गोष्टीचंपण ओझं बनू शकतं (जर तुम्हाला ते पदार्थ आवडत नसतील तर ;-)). मग प्रश्न येतो तो हा की ‘मी उपवास पाळत नाही‘ म्हणजे मी काही विशेष करतोय का ‘मी आवडत नसतानाही उपवास पाळतो आईला छान वाटावं म्हणून‘ म्हणजे मी काही विशेष करतोय? इतरांच्या प्रेमाचं, काळजीचं पण कधी कधी ओझंच होऊन बसतं...

अजून एक ओझं पुरूषांना जाणवतं ते ‘कर्ता‘ असण्याचं. माझ्या मते मी हे ओझं पण झुगारून दिले आहे निदान काही काळापुरते तरी.

आणि हो. काही ‘आधुनिक ओझी‘ आहेतच: चांगला बाबा होण्याचं ओझं. चांगला जोडीदार होण्याचं ओझं. स्त्री-पुरूष समानतेतला चांगला पुरूष, चांगला मित्र होण्याचं ओझं. ही ओझी अशासाठी की ‘चांगला‘ असण्याची व्याख्या हे कोणी इतर ठरवतात आणि त्याप्रमाणे निवाडा केला जातो. हे दुसर्‍यांच्या अपेक्षांना पुरून उरण्याचं ओझं फारच त्रासदायक. पण हे ओझं लिंगनिरपेक्ष असावं.

शेवटी मला मनापासून पटलेलं एक वाक्य जे ओझं झुगारण्याच्याबाबतीत लागू पडतं असं मला वाटतं :
Be true to yourself. You will stop caring what others think of you when you will realize how rarely they actually do.

- सचिन

Friday, August 2, 2013

ओझं

मी माझ्यापुरता लावलेला अर्थ असा आहे..
माझ्या अस्तित्वावर,आचार,विचार,उच्चारांवर प्रभाव असणारे असे घटक की ज्यांची निवड मी केलेली नाही.
असं काहीच माझ्याबाबतीत नाही आणि (म्हणून) माझ्यावर कोणतंच ओझं नाही असं म्हणणं अशक्यच आहे.
तर ही ओझी मला काचतात का ?
कधीकधी काचतातही पण एकूणात विचार केला तर सध्याच्या समाजरचनेत माझ्यावरची ओझी लाभदायीच आहेत.
मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच शोषित/वंचित असे जे समाजगट/व्यक्ती आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे असं मला वाटतं.
मी पुरुष म्हणून जन्माला आलो, ब्राह्मण जातीत जन्माला आलो, सरासरीच्या वरची बुद्‍धिमत्ता आहे, आर्थिक परिस्थिती चांगली होती/उत्तम आहे वगैरे वगैरे.
कोणतेही निकष लावून उतरंड मांडली तर मी त्यात privileged elite या गटात असणार आहे. माझ्या काही विशेषाधिकारांचे थोडेफार आनुषंगिक तोटे नक्कीच आहेत...


"The best years of your life are the ones in which you decide your problems are your own.You do not blame them on your mother, the ecology, or the president. You realize that you control your own destiny."
Albert Ellis



-- मिलिन्द

Thursday, June 20, 2013

थोडेसे मनातले....

काल आईशी बराच वेळ स्काईप वरती बोलत होते, बोलत होते म्हणजे कुरकुर करत होते, की  मी कशी कंटाळले आहे,डिप्रेशन आले आहे वगैरे वगैरे. आईसाठी ते नेहमीचे झाले आहे आता, कारण डिसेंबर मध्ये थंडी सुरु झाली तशी माझी कुरकुर पण सुरु झाली. आई चिडून पटकन म्हणाली, मग कशाला गेलीस एवढ्या लांब? तुलाच हौस होती. चटकन डोळ्यात पाणी आले. वाटले खरच का एवढी हौस होती मला इथे यायची? विचार केल्यावर जाणवले मुळीच नाही.अमेरिका बघावीशी वाटायची पण आई वडिलांना सोडून दूर वगैरे राहायची मुळीच इच्छा नव्हती. पण लग्नानंतर ६ महिन्यात एवढी चांगली संधी आली होती तर ती सोडावीशी ही वाटली नाही.तरी अमरेंद्र ने १० वेळा विचारले होते नक्की जायचेय ना?मी बिनधास्त पणे  म्हणाले होय जाऊयात.पुढचे परिणाम काय होणार आहेत ह्याची तेव्हा कल्पना नव्हती.. कदाचित त्याला होती......!
              अमेरिकेत पहिले महिने अर्थातच मस्त जातात, मस्त फिरायचे, नवीन नवीन ठिकाणी जायचे, खायचे प्यायचे, मजा करायची. अर्थात मी हे पुण्यात पण करायचे, पण शेवटी अमेरिका ना,वेगळेच असते. पहिले २-४ महिने ह्या मधेच जातात, mall मध्ये shopping करणे, AC shops मध्ये भाजी घेणे, हे सगळे वेगळे अनुभव असतात ना त्यामुळे दिवस निघून जातात.पण ५ ६ महिन्यांनी त्या गोष्टींचा पण कंटाळा यायला लागतो.पहिल्यांदा घराची सगळी कामे करायला जी मजा  येत होती ती कामे करणे bore होतं . काय सारखी सारखी भांडी घासायची,घर आवरायचे?"स्वयंपाक करायचा कंटाळा येतोय फार" माझे रोजचे कुरकुरणे सुरु झाले. मग पुन्हा एक ट्रीप व्हायची आणि सगळे नॉर्मल व्हायचे.कधी कधी वाटते ही ह्याचीच तर आयडिया नव्हतीना मला boredom मधून बाहेर काढायची? म्हणजे बायकोला फिरवून आणले की बायको at least २ महिने शांत होईल.कदाचित त्याला ही trick त्याच्याच एका  मित्राने सांगितली असेल कारण अशा phase मध्ये असणारी मी फक्त एकटी नव्हते.
              आम्ही जिथे राहतो ती एका गुजराथी माणसाची बिल्डिंग आहे, त्यामुळे अर्थातच इथे भारतीय लोक जास्ती आहेत. आम्ही DHL च्या project साठी येथे आलो. DHL ऑफिस ५ mins वर आहे त्यामुळे ह्याच्या ऑफिस मधली सगळी जण एकाच बिल्डिंग मध्ये राहतात.आमच्या बिल्डिंग मधले वातावरण अगदी घरगुती आहे,एकमेकांकडे येणे जाणे,नवीन पदार्थांचे testing कायमच चालू असते.आम्ही सगळ्याजणी H4 VISA वाल्या आहोत.म्हणजेच आम्ही आमच्या navaryanchya dependent आहोत.Dependent म्हणजे अमेरिकन govt  च्या मते काहीही न करू शकणाऱ्या व प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर depend असणाऱ्या.पहिल्यांदा ऐकायला विचित्र नाही वाटले कारण आम्ही सगळ्याच सेम होतो ना.पण हळू हळू त्याचा मतीतअर्थ जाणवला,खरच आम्ही dependent आहोत इथे.
              आम्ही सगळ्या मैत्रिणी दुपारी टी पार्टी करतो,गप्पा मारतो,दोघी जणींना छोटी मुले आहेत त्यामुळे छान वेळ जातो.गप्पांचा विषय बऱ्याच वेळा त्यांची मुलेच असायचा मला आधी आधी चांगले वाटायचे पण नंतर कंटाळा यायला लागला रोज रोज काय तोच विषय.त्यांना पूस्तकांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. मग मी बोअर व्हायचे,त्यांना कायम विचारायचे तुम्ही माझा आधी २ वर्ष इथे राहून काय केले तर त्या म्हणायच्या काहीच नाही,मी हसायचे म्हणायचे म्हणजे काय?काहीच नाही म्हणजे काय हे आता मला इथे २ वर्ष राहिल्यावर कळले.आता जरी मला कुणी विचारले कि मी २ वर्ष राहून काय केले तर माझे पण हेच उत्तर असेल "काहीच नाही".
             माझ्या ह्याच group मध्ये एक मैत्रीण आहे ती electronic engineer आहे आणि जेव्हा ती इथे आली तेव्हा ती मोठ्या software co.मध्ये काम करत होती.लग्न झाले तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवीत होती,तिला विचारले नौकरी सोडून इकडे यायला वाईट नाही का ग वाटले तर मला म्हणली ,"वाटले थोडेसे,खरं तर मला लंडन ला onsite वर जायचा chance  होता पण ह्याला पण US ला यायचे होते ना म्हणून सोडून दिली नौकरी,शेवटी कुणाला तरी compromise करायचेच होते ना ग..." खद्कन हसले तिला काही कळलेच नाही sorry म्हणून उठून गेले आणि घरी येउन विचार करू लागले मी कोणत्या काळात आहे,१९४० का १९७०?तिनेच एके दिवशी सगळ्यांना जेवायला बोलावले,काय मस्त स्वैपाक केला होता मी म्हणले कसं ग जमते तुला सगळे तिकडे एवढा जॉब करून पण kitchen queen कशी काय तू मी तर फारच ढ आहे तुझापुढे.तर मला म्हणाली, "अग लग्नापूर्वी मला पोळ्या पण येत नव्हत्या पण लग्नानंतर इथे आले आणि सगळं जमु लागले" मी म्हणाले कसा काय,तर म्हणाली "आता किचनच माझे लाइफ आहे म्हणून तर ५ वर्ष राहू शकले नाहीतर किती कंटाळा आला असता,तुला पण होईल सवय १-२ वर्षात तू पण माझा सारखी होशील".माझा पोटात मोठा गोळाच आला,हिच्यासारखे म्हणजे २४ तासामधले ८ तास स्वयंपाक time pass म्हणून करायचा?माझी स्वैपाक करायला कधीच ना नाहीये पण वेळ जात नाही म्हणून दिवस त्यात घालवणे पटणार नाही.घरी गेल्यावर विचार केला मी खरच तिच्यासारखी झाले तर म्हणजे मी मीच नाही राहणार.हे योग्य आहे का अयोग्य मला कळत नव्हते तेव्हा पण आणि अजून पण.पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....!
            ६ महिन्यानंतर २ महिन्यांसाठी भारतात जाऊन आले,काय मस्त वाटत होते तेव्हा परत यायची इच्छाच नव्हती पण काय करायचे एवढा चांगला chance मिळतोय तर का सोडायचा?"शेवटी कुणाला तरी  compromise करायचेच होते ना".बघा म्हणजे मी पण असाच विचार केला आणि नंतर स्वतःच justification देत बसले कि स्वतःच्याच नवऱ्यासाठी करतेय ना मग काय त्यात?पण यावेळेला ठरवले वेळ वाया जाऊ द्यायचा नाही,आल्या आल्या दोघांनीही ४ व्हिलरचा लायसन्स काढला,library जॉईन केली ती पण मराठी पुस्तकांची,म्हणले आता काय वेळ जायला प्रोब्लेम नाही.येताना सगळ्यांनी सांगितले होते कि काहीतरी शिक निवांत बसू नकोस,courses ची inquiry सुरु केली, Atlanta च्या बऱ्याच universities ची माहिती काढली पण एकही university मध्ये माझा लायक course  नव्हता.इथल्या लोकांचे म्हणणे तुम्ही graduation पासून शिका व त्यासाठी entrance द्या. १-२ वर्षाचे courses  करणे शक्य नव्हते कारण आम्ही ३ महिन्यांच्या contract वर होतो. हे contract दर ३ महिन्यांनी वाढायचे पण प्रत्येक वेळेला वाढेलच असेही काही नव्हते,त्यामुळे इथे सलग ६ महिने राहू ह्याची assurity  नव्हती.तेव्हा शिक्षणाचा प्रश्न मागे पडला.आता घरात बसूनच काही तरी करायचे,मग २ ३ trip झाल्या  San Francisco मध्ये १ लग्न attend केले,जीवाचे new york करून आले,अमेरिकेतले fall colors पण पाहून आले तोपर्यंत सगळे मस्त चालले होते,मात्र थंडी सुरु झाली आणि सगळे बिनसले.ट्रिप्स बंद झाल्या आणि मी पुन्हा घर कोंबडी झाले.....
           खरं तर अमेरिकेत राहायचे म्हणजे नवऱ्यावर depend राहायचे,सगळ्याच बाबतीत ,कुठेही जायचे म्हणल्यावर त्याला घेऊन जायचे,मी तर सुरुवातीला parlor ला पण त्याला घेऊन जायचे,माहित नाही का भीती वाटायची एकटे एकटे जायची,कुठे तरी असे जाणवायचे कि मी माझ्या देशात नाहीये.कुणी काय बोलले तर मला इंग्लिश बोलता नाही आले तर,आता हे आठवून हसू येते पण तेव्हा असेच होत होते.अमरेंद्र मला dollars द्यायचा म्हणजे कुठे हि मला काही आवडले तर पटकन घेता यावे किवा मी कुठे एकटी गेले तर असावेत म्हणून,पण माझा मैत्रिणी अशा आहेत कि त्या मला म्हणतात कशाला आपण पैसे ठेवायचे स्वतः जवळ कुठेही गेलो तरी नवरा असतोच कि बरोबर त्यालाच मागायचे,एक मैत्रीण तर मला म्हणाली 'आमचे हे' मला पैसे ठेऊ देत नाहीत स्वतःजवळ,म्हणतात तू हरवशील.मला तर रागच आला म्हणले पैसे हरवायला काय ती १० वर्षाची आहे का?आणि जर तीच कधी कुठे हरवली तर ती काय करणार?तुला कसा contact करणार?घरी कशी येणार?पण एकदा accept केले न कि आपण dependent  आहोत कि मग स्वतःचे डोके पण वापरायचे नाही त्यासाठी पण नवऱ्यावर dependent राहायचे.तेच मी जेव्हा भारतातून आलेल्या माझा जावेला घेऊन एकटी atlanta फिरले तेव्हा ३ ४ दिवस का होईना मी पहिल्यांदाच INDEPENDENT झाले.आम्ही दोघीच इथल्या marta म्हणजेच लोकल ट्रेन ने फिरलो तेव्हा मला कशाचीच भीती वाटली नाही,अमरेंद्र ने माझ्यावर तिला सोपवले आणि मी माझी जवाबदारी समर्थपणे पार पाडली असे आता म्हणायला काहीच हरकत नाही.याचा अर्थ आम्हाला इथे कुणी बांधून ठेवले नाहीये पण आम्हाला हे बंधन आता आवडायला लागले आहे.नवऱ्यावर depend राहणे हि आमची गरज बनलीये.
          अमेरिकेत माझ्या बऱ्याच मैत्रिणी H 4 VISA वर आहेत,त्यातल्या बर्याच जणींना मुले झाली आहेत,त्यांना विचारले कि तुम्ही दिवसभर काय करता?तर म्हणतात मला तर बाई वेळच मिळत नाही इथे मला एकटीला मुलांचे सगळे बघावे लागते त्यामुळे ट्रीप वगैरे करायला सुद्धा वेळ नाहीये.कुठेच बाहेर जाता येत नाही,सगळीकडे जाताना पहिल्यांदा बाळाचा विचार करावा लागतो.मग मी म्हणाले करमते का ग इथे?तर म्हणतात ठीक आहे इथे,निवांत कुणी विचारायला नाही.privacy पण मिळते ना,मग मी म्हणाले अगं पण तुझा काय तुला दिवसभर बाळाला सांभाळून,घराची कामे करून कंटाळा येत नाही का तर म्हणते अगं savings किती होतात अमेरिकेत,मग करायचे थोडेसे मुलांच्या भविष्यासाठी compromise.मी तर ऐकतच बसले,केवढी careeristic मुलगी होती हि एकदम काय झाले हिला?मला म्हणाली तू पण chance घेऊन टाक इथे बाळ झाले तर अमेरिकन सिटीझन होईल,आणि तुझा वेळ पण जाईल.म्हणजे माझा वेळ जाण्यासाठी तिने मला एकदम नामी उपाय सांगितला होता.म्हणजे मला अमेरिकेत राहायचे असेल तर एक तर स्वैपाक घरात वेळ घालवणे किवा अगदीच कंटाळा येत असेल तर मुल होऊ देणे असे २ ३ च पर्याय माझ्या मैत्रिणींनी सुचवले.
          या सगळ्यान वरती माझा एका H 4 वाल्याच मैत्रिणीने मारलेली comment मला कायमच लक्षात राहिली,एक दिवशी ती बोलता बोलता मला म्हणाली,"पूजा आपण म्हणजे शिकली सवरलेली घर कामाची बाईच आहोत कि ग  इथे".तेव्हा खूप हसलो आम्ही दोघीजणी,फोन ठेवल्यावर भरूनच आलं दोघीनाही,तिने २ मिनिटात पुन्हा फोन केला व म्हणाली यासाठी नव्हतो ना ग आलो आपण इथे....!मग का आलो होतो आपण इथे माहित नाही.facebook वर खूप जुन्या मैत्रिणी भेटतात,मी अमेरिकेत आहे म्हणल्यावर कित्ती कौतुक वाटते त्यांना म्हणतात लक्की आहेस बाई आम्हाला बघ किती मरमर करावी लागते इथे.मी विचार करते मी त्यांच्या जागेवर असते तरी हेच म्हणले असते ना.पण आता मला त्यांना सांगावेसे वाटते तुम्ही ज्या गोष्टी बद्दल तुम्हाला कौतुक वाटते त्याचा प्रचंड कंटाळा आलाय मला आणि तुम्ही ज्या गोष्टी साठी कुरकुर करताय त्यसाठी तुमची असूया वाटते मला.या परिस्थितीत एकाच म्हण आठवते "Other side of the grass is always greener".
          मध्ये माझा एका मैत्रिणीने सांगितले कि,H 4 VISA असणाऱ्या मुलींने blog लिहायला सुरुवात केलीये,त्यावर त्यांनी त्यांना येणारे प्रोब्लेम्स लिहिले आहेत आणि त्यावरचे solutions पण लिहिले आहेत.तो ब्लोग वाचता वाचता मला अजून १ माहिती मिळाली ती म्हणजे अश्याच एका मुलीने अमेरिकेत असणाऱ्या dependent साठी facebook वर १ कम्यूनिटी तयार केली आहे,त्या कम्युनिटी चे नाव आहे 'H 4 VISA,a Curse'.या community वर माझासारखेच २००० जण मेम्बर्स होते,मी पण ती community जोइन केली.त्यामध्ये dependents न येणारे प्रोब्लेम्स व इतर मेम्बेर्स ने दिलेल्या प्रतिक्रिया होत्या तसेच त्यांनी सुचवलेले उपाय हि होते.याचा अर्थ माझासारख्या २००० जणींना H 4 VISA शाप वाटतो सगळच अजब आहे ना?पण सगळ्यांची मते वाचल्यावर हेच जाणवले कि सगळ्यांचे almost प्रोब्लेम्स एक सारखे आहेत,सर्वांनाच इथे राहायचा कंटाळा येतो पण राहावे लागते.        
         पण एवढ्या सगळ्या वाईट किवा नकारात्मक गोष्टींचा विचार झाल्यावर सकारात्मक गोष्टी पण बोलल्या गेल्याच पाहिजेत.अर्थातच एवड्या प्रगत देशात राहिले त्याचा मला खूप आनंद आहे.इथले रस्ते,इथल्या बिल्डींग्स पहिल्या कि कसले भारी वाटते .एवढे स्वच्छ आणि मोठे रस्ते पाहिल्यावर दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटते.इथले मॉल खूप मोठे आणि अत्याधुनिक आहेत.मी अमेरिकेत आल्यामुळेच sears towerchya १०३ ऱ्या मजल्यावर जाऊ शकले,फक्त tv आणि movies मध्ये पाहिलेली Los angeles,San Francisco,Chicago,New york ,hollywood सारखी शहरे बघू शकले.निळ्या -हिरव्या रंगाचा समुद्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला,मिठासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या वाळूमध्ये खेळता आले,NASA  सारख्या ठिकाणी जाता आले,US Open ची tennis tournament बघता आली,अशा आणि अनेक गोष्टी पहिल्यांदाच बघायला आणि करायला मिळाल्या,.स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी खऱ्या झाल्या ते अमेरिकेत आल्यामुळेच ना!त्यामुळे इथे आल्यामुळे मी असमाधानी आहे का तर नाही नक्कीच नाही.इथे प्रत्येक गोष्ट खूप perfect आहे अगदी चित्र काढल्यासारखी,corrections विचार करून पण काढू शकणार नाहीत.पण एवढ्या परफेक्शनचा पण कंटाळा येतो न कधीतरी थोडेसे इमपरफेक्शन पण हवे ना,नाहीतर तुम्ही तुमचे depression, frustration कशावर काढणार?अमरिकेत आल्यापासून शाहरुख चा स्वदेस ५०-६० वेळा तरी पहिला,इकडे यायच्या आधीही बघितला होताच,पण इकडे आल्यावर तो पटला अगदी १००% पटला आणि आवडला. 

           या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर conclusion असे काहीच निघाले नाही,मात्र काही गोष्टींचे realization मात्र झाले,कि अमेरिकेत माझासारख्या मुलीना dependent म्हणून राहायचे असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये adjustment करावी लागते.H 4 VISA वर आल्यामुळे आम्हाला अमेरिकेत नौकरी करता येत नाही,contract वर अमेरिकेत आल्यामुळे शिक्षणाचे options खूप कमी असतात,गाडी चालवता येत नसेल तर स्वतःहून कुठेही जाता येत नाही कारण इथली transport service तितकीशी चांगली नाही,तेव्हा बऱ्याच जणींना घरी बसण्याशिवाय पर्याय नसतो.काही जणी voluntarily शाळेमध्ये किवा पब्लिक लायब्ररी मध्ये काम करतात पण बर्याच जणींना लहान मुलांमुळे बाहेर पडणे जमत नाही.
          तेव्हा मला पण आता असे म्हणावेसे वाटते कि "कुणालातरी compromise करावेच लागते".

..... पूजा

Saturday, March 9, 2013

पुरुषपणाची ओझी


>> बाईपणाची ओझी
हा विषय मला आवडला, आणि तेवढ्यावर न थांबता...
>> बायकांना बाई असण्याची ओझी आहेत तशी पुरूषांना पुरूषपणाची आहेत.
...हे इंद्रधनुने आवर्जून ध्यानात घेतलं, ते अधिक आवडलं.
----

या विषयावर मी फार संगतवार विचार केलेला नाही.
----

विषय ऐकताच मला सिंहगड सहलीतला एक प्रसंग आठवला...

कौस्तुभ आणि राजूचं रापलिंग झालं होतं. नीरजा आणि त्यानंतर आणखी एका मुलीने प्रयत्न करून माघार घेतली, मग सायलीने यशस्वीपणे पार पाडलं.
त्यावेळी कोणाची तरी आई म्हणाली की, बघा मुली कशा पुढे आल्या, मुलं मागेच आहेत.
त्यावर विद्या तिला म्हणाली, मुलांवर दडपण आहे, मुली सहज माघार घेऊ शकतात, मुलांना एकदा पुढे आलं की माघार घेता येणार नाही.
अगदी बरोबर. 
पुरुषांवर पुरूषपणाची जी ओझी आहेत, त्यात "पुरुषासारखा पुरुष, आणि घाबरतोस काय" हे एक नक्कीच आहे.
----

मात्र यावर अधिक विचार करण्यापूर्वी, आधी प्रस्तावनेसारखी थोडी विषयाची मांडणी करायला हवी, की जेणेकरून माझा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुरेसा स्पष्ट होईल.

एखाद्या गोष्टीचं ओझं वाटणे ही मानसिक अवस्था आहे. त्याचा वास्तवाशी/ परिस्थितीशी संबंध असेलच असं नाही. संबंध असला/ नसला तरी विचारांच्या बळावर किंवा स्वसंमोहन, NLP सारखी तंत्रे वापरून त्या अवस्थेतून बाहेर पडता येतं.

पण हे झालं वैयक्तिक पातळीवर. एखादी विशिष्ट मानसिक अवस्था सार्वत्रिकपणे आढळायला लागली तर ती परिस्थितीजन्य आहे, असंच समजायला हवं. (उदा. महायुद्धानंतर किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर आढळणारं सार्वत्रिक नैराश्य.)

त्यामुळे एखादी गोष्ट आपण केवळ पुरुष आहोत म्हणून आपल्यावर लादलेली आहे असे पुरुषांना सर्वसाधारणपणे वाटत असेल तर त्याला मी "पुरुषपणाचं ओझं" म्हणेन. (मला एखादी गोष्ट "ओझं" वाटत असेल, पण बहुसंख्य पुरुषांना वाटत नसेल, तर ती "पुरुषपणाचं ओझं" या सदरात येणार नाही. याउलट, पुरुषांना सर्रास ओझं वाटत असणारी गोष्ट, मला तशी वाटत नसली तरी येथे येईल. थोडक्यात, इथे मला ओझं वाटणाऱ्या गोष्टींविषयी नाही तर (माझ्यामते) पुरुषांना ज्या गोष्टी ओझं वाटतात, त्यांविषयी मी बोलत आहे).

ओझं या शब्दाचा संबंध माझ्यामते लादण्याशी आहे. (Compulsion हा शब्द मला इथे वापरायचा आहे, त्याला अगदी नेमका प्रतिशब्द सुचत नाही आहे). हे लादणं "टाळता न येणाऱ्या जबाबदारीतून" येऊ शकतं, पण त्याशिवायही समाजातील/ कुटुंबातील/ गटातील नियम, समजुती, अटी, प्रथा अशा कशातूनही येऊ शकतं.

ओझं ही वाईटच गोष्ट आहे, कोणत्याही प्रकारचं ओझं नसलंच पाहिजे, असंही मला म्हणायचं नाही. स्वीकारलेल्या चौकटीत कोणत्या न कोणत्या प्रकारचं ओझं असणारच आहे/ असतंच. फक्त चौकट कोणती स्वीकारायची याबद्दल काही किमान स्वातंत्र्य असावं (पुरुषपण किंवा बाईपण निवडता येत नाही , त्यामुळे त्या बाबतीत ते नसतंच) आणि स्वीकारलेल्या चौकटीत अगदी जाचेल तिथे थोडा वेगळा मार्ग निवडण्याची, थोडी वेगळी भूमिका घेण्याची मुभा असावी, तेवढ्यासाठी फार किंमत मागितली जाऊ नये, असं वाटतं.  

आपल्या पुरुषप्रधान समाजात, बाईवर बाईपणाची जितकी आणि जशी ओझी आहेत, त्यापुढे पुरुषपणाची ओझी अगदी फिकीच पडतील. पण म्हणून ती नाहीच आहेत असं नाही. कित्येक पुरुष त्या ओझ्यांखाली कोलमडलेलेही दिसू शकतात. 

पुरुषपणाची ओझी ही बाईपणाच्या ओझ्याचीच दुसरी बाजू आहे. पुरुषपणाची ओझी समजून घेतली तर बाईपणाची ओझी समजून घ्यायला मदतच होईल, असं मला वाटतं.
----

पुरुषपणाची ओझी कोणती याचा विचार करायला लागल्यावर प्रामुख्याने तीन प्रकारची ओझी मला जाणवली.

(१)

वरचा सिंहगडावरचा प्रसंग हे पहिल्या प्रकाराचं उदाहरण झालं. "आपण घाबरलोय" हे समाजापुढे (आणि सवयीने स्वतःकडेही) मान्य न करण्याचं ओझं पुरुषावर असतं, पण केवळ भीतीपुरतं हे ओझं मर्यादित नाही. दुःख, वेदना, दुखावलेपण इतकंच नाही तर हळवेपणा, संवेदनशीलता अशा अनेक नाजूक भावना (tender emotions) व्यक्त न करण्याची अपेक्षा पुरुषांकडून आपला समाज वेळोवेळी ठेवतो. त्या व्यक्त केल्यास खिल्ली, अनादर, अपमान अशा कशालाही पुरुषाला समोरं जावं लागू शकतं. प्रसंगी मित्रांच्या/ सहकाऱ्यांच्या गटातून बाहेर फेकले जाणे, कायमचा चेष्टेचा विषय होणे असे गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात. स्त्रीच्या सहवासात पुरुषांवरचं हे ओझं खूपच कमी होतं/ होऊ शकतं. जिच्याकडे रडता येईल इतकी जवळची एक स्त्री असणं, हे पुरुषासाठी त्यामुळे अमूल्य असतं.

या ओझ्याचीच दुसरी बाजू (flip side) म्हणजे कठोर भावना (hard emotions) व्यक्त करण्याची सक्ती. "थांब, संध्याकाळी बाबा आले की तुला ओरडतील" पासून ते अंत्यविधीला हजेरी लावण्यापर्यंत पसरलेल्या या अपेक्षेचं कित्येकदा ओझं वाटू शकतं. या अपेक्षा पूर्ण न केल्यास पुरुषाला भित्रा, पळपुटा, दुर्बळ किंवा अगदी नामर्दही समजलं जाऊ शकतं.

(२)

पुरुषपणाचं अगदी सर्रास दिसणारं ओझं म्हणजे आपण सक्षम आहोत, वरचढ आहोत हे दाखवण्याचं दडपण. हे नैसर्गिक ओझ्याचं स्वरूप असावं. निसर्गनियमानुसार मादीला आकर्षित करण्यासाठी नराला आपण सक्षम आणि आजूबाजूच्या इतर नरांपेक्षा वरचढ आहोत हे सिद्ध करावं लागतं. प्रगत मानवी समाजात हे इतकं थेट नाही तरी कर्तबगारीतून सिद्ध करावं लागतं. मग खेळातील हार-जीत ही कित्येकदा जीवन-मरणाचा प्रश्न बनते. आधुनिक समाजात स्त्रियांना करिअर हे मुक्तीचं, बरोबरी सिद्ध करण्याचं, आयुष्याचा परीघ वाढवण्याचं साधन असेल, पण पुरुषांसाठी अजूनही ती अस्तित्वाची लढाई आहे. 

वरवर एकत्र असणाऱ्या स्त्रियांमध्ये अनेकदा मत्सराची झाक असते असं मी कुठेतरी वाचलेलं. त्याच चालीवर असं म्हणता येईल की वरवर सहकार्य करणाऱ्या पुरुषांमध्ये स्पर्धेची झाक असते. ऐन कसोटीच्या क्षणी आपला वरचढपणा सिद्ध करायला पुरुषांना सजग राहावं लागतं. कामाच्या (corporate world) ठिकाणी तर हे स्पष्टपणे जाणवतंच, पण थोडं खोलात शिरून न्याहाळलं तर अनौपचारिक गटांमध्येही जाणवतं. 

(वादग्रस्त वाटेल पण) विनोद करता येण्याची अपेक्षा हे एक अगदी उघड नसलं तरी याच प्रकारचं एक खास पुरुषी ओझं आहे. कॉलेजजीवनात विनोद करण्याची क्षमता सिद्ध करता येत नाही या ओझ्याखाली दबलेले तरुण सापडतात. विनोदाला दाद देण्याचं काम मुलींकडे असतं. त्यांनी विनोद केले तर चालतात, पण नाही केले तर हरकत नसते. विनोदाला अधिक चांगली दाद देणाऱ्या मुलीकडे अनेकदा विनोदबुद्धीचा मापदंड (benchmark) म्हणून पाहिलं जातं.

या प्रकारचं ओझं मरणप्राय यातना देणारं, जीवघेणं असू शकतं. (मागे एकदा बोलताना मांडल्याप्रमाणे) "कर्ता" पुरुष दारूच्या आहारी जाण्यामागे किमान कर्तबगारी सिद्ध न करता आल्याचं ओझं अनेकदा कारणीभूत असतं.

(३)

तिसरं ओझं म्हटलं तर सर्वमान्य आहे, म्हटलं तर समाजाला अगदीच अमान्य आहे. (हे ओझं वादग्रस्त आहे, ते मांडायला हे व्यासपीठ ही कदाचित योग्य जागा नसेल. पण पुरुषपणाची ओझी मांडायची आहेत तर हे मला टाळता येणार नाही. )

हे ओझं म्हणजे "एकपत्नीत्व" (monogamy) हे कुटुंबव्यवस्थेने  आणि कायद्यानेही लादलेलं ओझं. ते समर्थनीय आहे अथवा नाही यात आता पडायला नको. पण हे एक (माझ्या समजुतीनुसार) अनैसर्गिक अशा अपेक्षेचं ओझं पुरुषावर असतं, आणि समाजात वावरताना आपण जणू हा नियम स्वखुशीने स्वीकारलाय, आपल्याला तो आनंदाने मान्य आहे, इतकंच नव्हे तर आपण जणू या नियमाचे रक्षणकर्तेच आहोत, अशा तऱ्हेने वागण्याची जवळपास सक्तीच पुरुषावर (आणि स्त्रियांवरही) असते.

बाईपणाची अनेक ओझी ही नैसर्गिक प्रवृत्तींवर घातलेल्या कृत्रिम बंधनातून आलेली दिसतात. ती ओझी कशी असतील याची पुरुषाला एक झलक दाखवणारं असं हे ओझं आहे.

त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की पुरुषांच्या (स्त्रीविरहित) अनौपचारिक गटात हे ओझं बहुतेक वेळा मोकळेपणाने आणि सर्वानुमते मान्य केलेलं असतं आणि वागण्यात नाही तरी निदान बोलण्यात तरी काही अंशी झुगारून दिलेलं असतं.
----

वर लिहिल्याप्रमाणे या विषयावर मी फार विचार केलेला नाही. या लेखाच्या निमित्ताने थोडा विचार झाला, निदान सुरुवात झाली. सिंहगडावरील प्रसंगाबद्दल आणखी एक गोष्ट लिहून थांबतो.
----

सिंहगडावर रापलिंग करताना सचिन दोनदा मागे फिरला.  नंतर तर त्याने ते छानपैकी केलंच, पण मला वाटतं रापलिंगपेक्षाही मागे फिरणं कोणाही पुरुषाला जास्त कठीण होतं. सचिनपेक्षा जास्त भीती वाटूनही मागे न फिरलेले पुरुष तिथे असतील.  सचिनने केली ती एक बंडखोरी होती. मागे फिरलेलं चालणार आहे हा एक नवा पर्याय त्याच्यामुळे पुरुषांना उपलब्ध झाला. 
सचिन, हे मला खरंच जमलं नसतं, मला तुझं कौतुक वाटतं.

-- नीरज

Wednesday, November 28, 2012

वाचकांचे लेख -- आमच्याकडे असंच असतं...


विद्याच्या लेखातल्या "तुमच्याकडे गणपतीला तळणीचे मोदक चालतात का ग?" हे वाचल्यानंतर मनात "तुमच्याकडे" आणि "आमच्याकडे" यावर बराच विचार झाला आणि मग जे काही प्रश्न पडले ते म्हणजे हा लेख..

आमच्याकडे गौरीनिम्मित ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु होता.. माझ्या माहेरी कुमारीकांची ओटी भरण्याची पद्धत नाहीये त्यामुळे मी जरा बिचकत होते. पटकन सासरच्या काहीजणी पुढे आल्या आणि म्हणाल्या " आता हे सगळ शिकून घे.. आमच्याकडे असच असत". मुळातच ओटी  वगैरे रस नसल्याने मी त्या जे सांगत होत्या तसे करून मोकळी झाले..

सासरचे वातावरण बरयापैकी लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल ह्याविषयी भीड बाळगणारे.. तरीदेखील घरात धुम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणे आणि मांसाहार होतो. असं कसं चालत विचारल्यावर उत्तर एकच "आमच्याकडे असंच असत.. तुलाही होईल सवय हळूहळू"..

हे "आमच्याकडे असच असत" प्रकरण तुम्ही सगळयांनी सुद्धा कधी ना कधीतरी ऐकले असेलच.. वेगवेगळ्या प्रसंगात.. वेगवेगळ्या संदर्भात.. काहींनी तर ते अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, एखादी भाजी एका विशिष्ट पद्धतीने बनवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे अश्याही बाबतीत ऐकले असेल..

घरात एखादी मुलगी सून होऊन येते याचा अर्थ ती घराची कोणीच नसते का??  नवीन येणार्या सुनेने स्वत:च्या वागण्याने सगळ्यांची मने जिंकून घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? घरात आधीपासून जे राहत आहेत त्यांचा त्या घरावर हक्क जास्त हे पटतेही एकीकडे.. पण म्हणून नव्याने राहायला येणाऱ्या/री ने त्या साच्यात स्वत:ला बसवून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे कि बरोबर?

कोणत्याही घराचे ठरलेले असे साचे, संस्कार असतात.. प्रत्येक कुटुंबागणिक ते बदलतात. हे सगळ्यांनाच माहित आहे आणि कबूलही आहे. कदाचित या सगळ्यांची नंतर सवयही होत असेल.

पण तरीही हे वाक्य मनावर कुठेतरी ओरखडा काढतं हे नक्की.. 

तुम्हाला असे प्रश्न पडले का? याबाबतीत तुम्हाला काय वाटत??

- स्पृहा

Wednesday, August 15, 2012

वाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..

आता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्या नवर्याला या वर्षी काय वाण मिळेल याची उत्सुकता इकडे लागून राहिलेली आहे. तिकडे आई बाबांची सुद्धा वाण म्हणून द्यायला सोनाराकडे एक फेरी झाली आहे.

का देतात अधिक मासात जावयाला वाण?? कुणाला ठाऊक आहे? इकडे ज्या लोकांना वाण काय मिळणार म्हणून उत्सुकता आहे त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते काहीतरी विनोदी उत्तरे देऊन माझा प्रश्न हसण्यावारी नेत आहेत..

मुळात अधिक महिनाच काय? पहिल्या वर्षाच्या प्रत्येक सणाला जावयाला आणि मुलीच्या सासरकडच्या लोकांना काही ना काही दिले पाहिजे असं शास्त्र कोणी काढलं? आणि ते का पाळाव लागतं??

इतक्या का आपण मुली टाकाऊ असतो? कि आपल्यासारखीला आश्रय देणारा जावई महान होय.. त्याला लग्नात हुंडा द्यावा, मग लग्नानंतर पहिल्या वर्षी प्रत्येक सणाला काही ना काहीतरी द्यावे; हे काय कमी म्हणून आयुष्यभर.. म्हणजे अगदी सासू ९८ वर्षाची झाली आणि जावई ७० वर्षाचा म्हातारा झाला तरीही अधिक मासाचे वाण द्यायचे. हे काय कमी म्हणून ती सासू वारली तरी मुलीचा भाऊ वाण देऊन हि परंपरा कायम ठेवतो.

माझा ह्या देण्या-घेण्याला सक्त विरोध आहे. का म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या सासरी हे असं सतत देत राहायचं?? आई-वडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांना "नका देऊ" सांगून पटत नाही. सासरच्यांना नका घेऊ सांगितलेले आवडणार नाही. नवर्याला सांगितले तर तो म्हणतो कि "मला त्यांच्याकडून काहीही नको पण त्यांनी खूप आग्रह केला तर मला त्यांचे मन मोडवणार नाही".

मला नक्की माहितीये कि सध्या माझ्या आई-वडिलांची जावयाला सोन्या-चांदीची वस्तू देण्याची नक्कीच ऐपत नाहीये. त्यांनी पोटाला चिमटा काढून हि वस्तू घेतली आहे. आधीच माझ्या लग्नासाठी बाबांनी खूप कर्ज काढले होते. (मुळात लग्न साधेपणाने करायची आमची इच्छा होती पण मोठ्यांनी ती हाणून पाडली. इकडची (सासरची) माणसे आम्ही लग्नाचा अर्धा खर्च करतो असं म्हणत होते.. पण माझेच आईवडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांनी लग्नाचा सगळा खर्च ऐपत नसतांना स्वत:च उचलला).

आता मला आई-बाबांकडून काहीही घ्यायला लाज वाटते. ह्या सगळ्या सिस्टीम वरच खूप राग येतोय..

हि कुठली भिकारडी (विवाह) संस्था?? मुलीच्या आईवडिलांच्या पोटाला चिमटे घेऊन त्यांना मुलीच्या सासरकडच्या लोकांचा मानपान करायला लावणारी? मी लग्न केले हे चुकले का?? कि विधिवत लग्न करायची त्यांची (माझ्या आणि नवर्याच्या आईवडिलांची) अट मानली हे चुकले?

खूप कात्रीत अडकल्यासारखे झाले आहे. तुम्ही अश्या प्रसंगातून गेले आहात का? काय केलेत अश्या वेळी? मी काय करू शकते अश्या प्रसंगात?

- आश्लेषा

Tuesday, July 17, 2012

वाचकांचे लेख -- छान चाललंय आमचं !!! ( "ओरखडा"वर प्रतिक्रिया)

ह्याच विषयावर खर तर मीही लिहिणार होते.. मध्यंतरी नवऱ्याशी थोडा अबोला धरला होता (खर तर त्या वेळी खूप म्हणजे खूपच राग आला होता) आणि नेमके घरात पाहुणेच पाहुणे येत होते त्या दिवशी..

त्या दिवशी त्या सगळ्यांसमोर सगळ काही छान चाललंय असा अभिनय करण्याचा खूप वैताग आला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला कि काय त्रास आहे? नवरा-बायको मध्ये वाद होतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे (उदा. जवळ जवळ ठेवल्यावर भांड्याला भांड लागायचंच!!! हि म्हण). तरीही आमच्यात काही वाद झाला असेल तर तो असा लपवायचा का?? माझ्या सासूबाई पण अध्येमध्ये म्हणतात.. "नवऱ्यात आणि आपल्यात काही वाद झाला तर तो आपला आपल्यात ठेवावा, लोकांना कळता कामा नये" तेव्हा त्यांचा काय राग आला होता. आपणच का गप्प बसायचं नेहमी? बाईनेच का घरच्या अडचणी घरातच दाबून टाकायच्या?? इत्यादी विचार मनात आले होते.

पण.. नंतर शांत झाले तेव्हा मला ते पटले बरेचसे..

आणि मग माझ्या लक्षात आले.. त्या दिवशी "आमच्यात वाद झाला नाहीये" याचा अभिनय माझ्या नवऱ्यालासुद्धा तितकाच करावा लागला होता.. असं नव्हत कि तो पुरुष होता म्हणून येणाऱ्या-जाणार्यांना मोकळेपणाने "आमच भांडण झालंय" असं सांगू शकला.. मग मी विचार केला.. घरात काहीतरी बिनसलंय हे चारचौघात सांगायचा अधिकार/ मोकळीक आपल्या घरात कोणाला असते? तर कोणालाच नाही.. अगदी घरचे मोठे/कर्ते असूनही माझ्या सासू-सासर्यांनाही नाही.मग लक्षात आले, "सगळं काही छान चाललंय" हा सामाजिक शिष्टाचाराचा एक भाग आहे निव्वळ.

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? तुम्हांला काय वाटतं?>>>

"गृहच्छिद्र कोणाला दाखवू नये" असं म्हणतात.. त्यामागे काही कारण आहे.. माझ्या मते त्याचे कारण आपण किंवा पुरुषप्रधान संस्कृती नसून घरातली चुगलखोर आणि इतरांना बदनाम करायला टपलेली माणसे हे आहे. प्रत्येकाच्या घरात काही अधिक-उणे असते हे जितके खरे आहे तितकेच हेहि कि आपल्या आसपासच्या बऱ्याचश्या लोकांना (ज्यांना आपण विघ्नसंतोषी म्हणतो) अश्या "उण्या" मध्ये फार रस असतो.. इतरांच्या घरातल्या कुठल्याही घडलेल्या घटनेकडे असे लोक चघळायला एक माल-मसाला अश्या दृष्टीने बघतात.. आणि मग गोष्ट षटकर्णी होते. हा सगळा प्रकार टाळण्यासाठी चार-चौघात आपले राग (लोभ मुद्दाम लिहिलेले नाहीये, मला लोभ न दाखवणे पटत नाही आणि त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे लवकरच) दाखवायचे नाहीत असा सर्वसाधारण शिष्टाचार रुजला असावा.

याखेरीज मीहि कधीतरी "नवऱ्यासोबत भांडण झाले आहे/ मी नाही बोलत ए त्याच्याशी" असं काहीजणांना उघड सांगून पाहिलं. म्हणजे मुद्दाम असं सांगितलं नाही.. पण ..का लपवायचं? आपण काही पाप केलं आहे का? इत्यादी इत्यादी भावनेमुळे मी ते लपवलं नाही. पण त्यामुळे मला विविध अनुभव आले.

१. बरेचजण खुश झालेले दिसले. आमच्यात समेट होण्यापेक्षा त्याचे कोणकोणते गुण मला आवडत नाहीत हे खोदून खोदून विचारून त्यांनी माझ्या रागात भर घालायचा प्रयत्न केला.

२. काही लोकांनी जज ची भूमिका घेतली. आणि स्वत: न्यायनिवाडा करायला बसले. आमच्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी विचारून घेतल्या आणि तुम्हा दोघांचे चुकले आहे.. दोघांनी अमुक केले पाहिजे.. आता आम्ही समाजाचा एक भाग असल्याने आमचे वर्तन कसे असले पाहिजे यावर तद्दन रटाळ लेक्चरबाजी केली आणि फुकट चहा पिऊन पळून गेले.

३.काही लोकांना (विशेषत: इकडच्या) माझ्यावर बोट ठेवायला कारणच हवे होते. त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. आणि ते मी कशी चूक आहे आणि माझ्या नवऱ्याशी कशी वाईट वागते हे सगळे बोलून यथेच्छ तोंडसुख घेतले. ते जेवढे मला बोलले.. तेवढे बोलण्याएवढा राग तर माझ्या नवऱ्यालाही माझा आला नव्हता. (शेवटी माझी बाजू घ्यायला नवराच मध्ये पडला आणि आमच्या रागाचे प्रेमात रुपांतर झाले).

या सगळ्या अनुभवातून हे शिकले कि थोडा वेळ लागला तरी चालेल..पण आपल्यातले भांडण शांतपणे चर्चा करून आपणच मिटवायचे.. (चोमड्या)लोकांना मध्ये पडू द्यायचे नाही. त्यांच्या हातात कोलीत द्यायचे नाही.

अर्थात.. तुमच्यातले भांडण कुठले आणि तुमच्यावर होणारा अन्याय कुठला ह्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे.. घरातल्या गोष्टी बाहेर काय सांगायच्या म्हणून एखादी अन्याय सहन करत बसली तर त्याला काय अर्थ? पण भांडण किंवा वाद शक्यतोवर आपला आपणच सोडवला पाहिजे.

असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.>>

अभिमानाने सांगायची गोष्ट नाही. पण असे मीही केले आहे. नवऱ्याचा राग आला असेल आणि टू-व्हीलर वर बसले असेल तर गाडी सिग्नलला थांबल्यावर सरळ उतरून भलत्याच दिशेला चालू पडायचे असा त्रास मी त्याला दिलेला आहे. बिचारा "गाडीवर बस" म्हणून माझी मनधरणी करत राहायचा मग. आणि थांबलेले लोक पाहत राहायचे. तसं तर हे खूप बालिश आहे. पण मला गम्मत वाटायची. तू त्या बाईचे/ मुलीचे वय दिले आहेस म्हणून.. नाहीतर मला वाटलं असत तू मलाच पाहिलंय असं करतांना कधीतरी.. ;)

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही? >>

कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता.

अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?>>

मला वाटत जोपर्यंत सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे (ते दोघे एकमेकांना शिवीगाळ करत नाहीयेत, मारामारी करत नाहीयेत, भर रस्त्यात उभे राहून एकमेकांची उणी-दुणी काढत नाहीयेत) तोपर्यंत आपण मध्ये पडणहि योग्य नाही.

आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही. >>

दोघांपैकी कोणावरही अन्याय होतोय असं आपल्याला वाटत नसेल तर पडायचं नाही.

मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.>>

आशा म्हणाली तसं मलाही वाटत कि त्यांना काही मदतीची गरज होती असं वरकरणी वाटत नव्हत.. उद्या तू सार्वजनिक ठिकाणी आहेस आणि तू थोड्याश्याच मोठ्या आवाजात नवऱ्याला काही बोललीस पटकन.. आणि मग एकदम चार लोक येऊन तुला काय झालं असं विचारायला लागले तर तुलासुद्धा कानकोंडच होईल बहुतेक..

समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.>>

हे मान्यच आहे.. पण ते (कोण)कोणत्या बाबतीत हेही ठरवायला हवं.

--गार्गी

Friday, June 29, 2012

वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. --- ३

छान लिहिलंयस ग..  
तू मनोविज्ञान किंवा विवाह समुपदेशन यापैकी कोणत्या क्षेत्रात आहेस का?
मनाचा गुंता अगदी सहज सोडवलास.. टप्प्याटप्प्याने..

तुझे काय चुकले?>> खूप लोक जेव्हा "तुझं चुकतंय" असं म्हणतात तेव्हा पटकन "माझं चुकलं" असं म्हणून एक पाउल मागे यायची माझी प्रवृत्ती आहे.. त्याचे मुळ कदाचित माझ्या मुलगी असण्यात किंवा मला ज्याप्रकारे वाढवले गेले त्यात असावे. काही वेळेस खरोखर माझी चूक असतेच.. पण ती नसते तेव्हाही माझं चुकलंय हे मी कबूल करते माझ्या अश्या वृत्तीमुळे..

"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे.>> हे असं म्हणणारे खूप कमी भेटतात.. आपल्या समाजात/ संस्कृतीत काही वेळेस काही विचार/भावना मनात येणे (उदा. काकस्पर्श), कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करणे हे सरसकट चूक मानले जाते. 

हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.>> ह्म्म्म.. हे बरोबर आहे. माझ्या बाबतीत मला आयुष्यातली बरीचशी मौजमजा करण्यासाठी मला लग्न होण्याची वाट पहायला लागली आहे (त्यामुळे मलाच माझ्या लग्नाची इतकी घाई होती कि मी सासरी जातांना रडले पण नाही :D :D) . तसं त्याचं झालं नसावं. आणि शिवाय माझ्याच नवरयापुरत बोलायचं झालं तर इकडे सासरी नातेसंबंधान्विषयी खूप पारंपारिक अप्रोच आहे. माझ्या सासरेबुवांनी कधीच अजूनही आईंना नावाने हाक मारलेली नाहीये किंवा (मी मागे म्हटलं तसं) कुठेच फिरायला वगैरे घेऊन गेलेले नाहीयेत.. मुलांची नावंसुद्धा ठेवतांना सासूबाईंना विचारले देखील नव्हते.. त्यांच्या आईने (माझ्या आजेसासूबाई) सांगितले ते नाव ठेवले. माझा नवरा तेच पहात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने कदाचित तो माझ्याशी बोलतो किंवा माझ्यासोबत बाहेर येतो हेच खूप (आणि पुरेसे) असेल.

आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?>> नक्कीच नाही. म्हणूनच मी काय ते स्थान निर्माण नाही झाले तरी चालेल.. पण त्याला त्याची कामे स्वत:लाच करू देते/ करायला लावते/ सांगते. मात्र माझ्या सासूबाई त्यावेळी आमची नव्हती हो टाप कधी नवरयाला स्वत:चे ताट स्वत: वाढून घ्या म्हणायची..असे भुवया विस्फारून सांगतात.. (मी गम्मत म्हणून सोडून देते :) ).

मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात. >> रंग-रूपाच्या बाबतीत मुळीच अशी प्रतिमा नव्हती. पण तो मला फुलासारखं जपेन (आणि माझ्यामागे भुंग्यासारखा फिरेन :D :D ), आणि सारख सारख मला काय हव नको ते विचारेन असे काहीतरी माझे विचार होते.. पण ते बरेचसे बालिश आहेत याची मला लग्नानंतर आपणहून जाणीव झाली. (शिवाय घरकाम करण्यात एवढी सूट आहे याला मी फुलासारखे जपणेच म्हणेन.)

नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.>> हे कोणत्या बाबतीत म्हणते आहेस? रंगाच्या, रूपाच्या, पैश्यांच्या, आवडीनिवडीच्या, सवयींच्या (उदा. स्वच्छता इत्यादी) कि स्वभावाच्या??

मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.>> तो एक भाग झाला.. मुळात स्त्रीचं सर्वस्व.. मग ते तन-मन-धन काही का असेना.. ते नवऱ्याच्या मालकीचं आहे.. तिच्या स्वत:च नाही, या संस्कारात आहे.. तू शारीरिक अनुषंगाने म्हणते आहेस पण आजही बरयाच मुली लग्न झाले कि आपली कोणत्याही मुलाशी असलेली मैत्री/ संपर्क  कमी करते क्वचित तोडून टाकते हि भावनिक गुंतवणूक झाली ना.. आणि धनाच्या बाबतीत तर आपण नकोच बोलूयात.. तो एक स्वतंत्र विषय आहे..

बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.>> आणि बायकोच तसं नसतं.. याच कारण पुन्हा त्यांना कसं वाढवलं गेलं आहे त्यात असत.. हो ना?

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.>> खुपदा असे विचार मनात येतात कि मी त्याला आपलंस करू शकले नाही.

त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.>> असेल.. सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे तोही अबोल असेल.. किंवा त्याच्या संस्कारात पुरुषाने आपल्या भावना व्यक्त करणे नसेल.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही. >> थोडक्यात आपला आनंद आणि भावना परावलंबी करायच्या नाहीत. बरोबर?

मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.>> हम्म्म.. याने निराशा नक्कीच कमी होईल.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )>>
हो ना.. पण मुळात आसपास नवविवाहित जोडपी पहिली कि ते प्रेमातला हा असा मिस यु लव्ह यु वाला बालीशपणा खूप करतात..त्यात पण मजा असते एक. मग मला असं वाटायचं कि आपल्या लग्नाला ६च महिने झाले, इतक्यात आपल्या नात्यातली नवलाई संपली का??कि आता मी असले काय नि नसले काय.. कुठे फरक पडतो? मी माझ्या लेखात जो प्रसंग सांगितला आहे त्यावरून मी काढलेला निष्कर्ष लग्नाला अजून ६च महिने झाले आहेत म्हणून सगळ्यांनी चुकीचा आहे असे सांगितले. पण उलट आमच्या लग्नाला २० वर्ष झाली असती आणि त्याला माझी आठवण आली नसती तर कदाचित आता मी माहेरी जाण्यात आता कसली नवलाई असं मीच म्हटलं असत..आणि मला वाईट वाटलं नसत.. नवऱ्याने आपल्याला सारख मिस यु किंवा लव्ह यु म्हणव हि अपेक्षा लग्नानंतरच्या पहिल्या ६ महिन्यानंतर असते कि लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यावर?? 
कदाचित माझा प्रश्न चुकला.. एकदम स्थान वगैरे म्हणणे एकदम चुकीचे होते.. पण त्याला माझी आठवण यावी हि अपेक्षा रास्त होती.. तुला काय वाटत??

स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.>> बर झालं सांगितलस ते.. माझा आटापिटा कमी होईल..

तुझ्या या स्वतंत्र लेखाबद्दल खूप खूप आभार.. आत्मपरीक्षण करण्यास मदत झाली आणि स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी सुद्धा..

ता.क. १. मी जिथे जिथे मुला-मुलीवर होणारे संस्कार आणि त्यांची वाढ असे म्हटले आहे तिथे मला पालक आणि आजूबाजूचा समाजही जे संस्कार करतो त्यांविषयी बोलायचे आहे. मी कुठेच पालकांना अश्या संस्कारांसाठी एकमेव दोषी मानलेले नाही.

ता.क. २. एवढी मोठी प्रतिक्रिया त्या लेखाखाली देण्यात तांत्रिक अडचण येते आहे त्यामुळे हि प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावा.

-पियू

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...