tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post5103435068507691638..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: स्त्री हीच स्त्रीची शत्रू?? किती खरं.. किती खोटं..विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-11550362300298799032013-10-05T06:37:55.496-02:302013-10-05T06:37:55.496-02:30हेवेदावे आणि मत्सर यात पुरूष कुठेही कमी नाहीत.
&g...हेवेदावे आणि मत्सर यात पुरूष कुठेही कमी नाहीत.<br /><br />>> आई-मुलगी, बहीण-बहीण या नात्यांमध्ये पुरुषप्रधान कुटुंबपद्धतीमुळे येणारी ही एक्स्ट्रॉची गुंतागुंत नसते. म्हणुन लेखात त्यांचा समावेष केलेला नाही. मुलगा-बाप, भाऊ-भाऊ यांच्यात ज्या कारणाने वाद/ भांडणे होऊ शकतात तेवढी पॉसिबिलिटी जनरली सगळ्याच नात्यांमध्ये असतेच.पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-10058582038698755982013-10-05T06:36:40.095-02:302013-10-05T06:36:40.095-02:30आपल्यात आणि आपल्या घरातल्या दुसर्या बाईमध्ये होणा...आपल्यात आणि आपल्या घरातल्या दुसर्या बाईमध्ये होणार्या वादाला पुरुषप्रधान कुटुंबपद्धती कारणीभूत आहे हे लक्षात आले की निम्मे वाद कमी होतात. दोन्ही बायकांच्या हे वेळीच लक्षात आले तर त्या एक होऊन ह्या सिस्टीमचे दुष्परीणाम (उदा. घरातले पुरुष आळशी असणे, त्यांनी घरकामात काडीची मदत न करणे, घरातल्या बाईच्या कामांची जाणीवसुद्धा न ठेवणे) कमी करू शकतात.<br /><br />पुरुष मुद्दाम असं म्हणुन आपली जबाबदारी का झटकतात याचे उत्तर मी शेवटून दुसर्या परीच्छेदात लिहिले आहे.पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-78169692779520600312013-10-05T06:34:23.670-02:302013-10-05T06:34:23.670-02:30आशा: बाईला आयुष्यात कधीच 'स्वतःचे' हक्काचे...आशा: बाईला आयुष्यात कधीच 'स्वतःचे' हक्काचे घर मिळू शकत नाही , हा पुरुषप्रधान कुटुम्बपद्धतीचा बायकांवरचा सगळ्यात मोठा अन्याय आहे असे मला वाटते. घराचा मालक हा नेहमीच पुरुष असतो आणि घरातल्या ज्या बाईचे कर्ता पुरुष ऐकत असेल ती त्या घराची मालकीण. त्यामुळे साहजिकच एका बाईला घरातली दुसरी बाई ही नेहमीच प्रतिस्पर्धी वाटत असते. मग ती सून असो, सासू असो वा सवत.<br /><br />लहानपणी आई मुलीला सांगते की हे तुझे घर नाही. लग्न झाले की नवर्याचे घर तुझे. तिथे गेलीस की तुझे मत चालव . लग्न झाल्यावर सासू सांगते की 'आमच्या' घरात तूला असेच वागावे लागेल. म्हातारे झाल्यावर सून ऐकवते , की तुम्ही आमच्या सोयीप्रमाणे अॅडजस्ट केले पाहिजे.<br /><br />या सगळ्यातून बायकांच्या मनात खोलवर कुठेतरी असुरक्षिततेची भावना असते. हे घर माझे आहे , पण घरातले माझे 'स्थान' काय , आणि ते इअतरांसाठी कीती महत्वाचे हा प्रश्न नेहमीच असतो.<br /><br />बाईच्या वागण्यात जरा वर खाली झाले , मानसिक आजार् , दुर्धर शारिरीक आजार असे काही तिच्या वाट्याला आले तर रहात्या घरातून तिची सहज हकालपट्टी होऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत बायकांचे बेघर होण्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे.<br /><br />त्यातल्या त्यात अता उच्च वर्गातून तरी बहुतेक बायांना हक्काचे घर, आणि घरात मानाचे स्थान मिळू लागल्याने पुर्वी कटूपणा असलेल्या नात्यात गोडवा दिसू लागलाय. तरीसुद्धा बायकांकडे अजुनाही service provider चा रोल असतो.<br /><br />जरा विचार करा, जर हे उलट असते तर पुरुष असे सासर्याशी जमवून घेवू शकले असते?पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-13457774808948772092013-09-27T10:39:13.823-02:302013-09-27T10:39:13.823-02:30कौटुंबिक सत्तेच्या उतरंडीत बाईचे स्थान पुरूषाखाली ...कौटुंबिक सत्तेच्या उतरंडीत बाईचे स्थान पुरूषाखाली असते. बायकांमधे सासूला वरचढ आणि सूनेला तिच्या खालचे. खूप वर्षे सून म्हणून वावरल्यानंतर ती सासू होते आणि अर्थातच सूनेला जसं वागवतात हे तिने पाहिलेले, अनुभवलेले असते, तसं वागवते.<br /> पुरूषसत्ताक व्यवस्था ही शोषणावर आधारीत आहे. शोषण होत राहिले तर ती टिकून राहणार.<br />इतक्या वर्षांनी मिळालेली थोडीफार सत्ता सासू वापरू पाहते. सत्ता वापरायची तर सूनेला बरोबरीचे स्थान कसे मिळणार? मी वरचढ आहे हे दाखवून द्यायचं म्हणजे निर्णय मी घेणार, मी ठरवणार असं ते असतं.<br /> जोवर सून आपली पायरी ओळखून असायची तोवर सासूची सत्ता ही मान्य केलेली अशी होती. आजकालच्या सूना अर्थातच हे मान्य करणार नाहीत. मग एकीचे निर्णय दुसरीने का मान्य करायचे? असं ते होतं.<br /> काही वेळा सासवांना छळणार्या सूनाही आहेत.<br />दोघींमधे शत्रुत्व असण्याचे कारण सासूचा मुलगा आणि सूनेचा नवरा...... हा जो पुरूष असतो..... तो दोघींच्याही प्रेमाचा. त्याच्यावर हक्क दाखवण्याची स्पर्धा सुरू होते. <br /> आपल्या नवर्याला सासूने जन्म दिला आहे आणि वाढवून मोठे केले आहे हे सूनेने आणि आपल्या मुलाला सूनेचीच खरी सोबत असू शकणार आहे हे सासूने समजून घ्यायला हवे.<br /> हा मुलगा कम नवरा ... बायको आणि आई यांचं नातं सुधारावं म्हणून काहीही करायला जात नाही, बरेचदा त्याने न्याय द्यावा अशी दोघींची इच्छा असते. किंवा हा मनुष्यस्वभाव असेल की दोघींनांही त्याने तीच कशी महत्वाची आहे हे जाहीर करायला हवं असतं.<br /> आई आणि बायको त्याला वेगवेगळ्या प्रकारे समृद्ध करत असतात, हे त्याने समजून घेणं आणि समजून देणं गरजेचं असतं.<br /><br />आई-मुलीत काय मतभेद नसतात? कुठल्याही दोन माणसांचं पूर्णपणे पटेल कसं? पण ते असे पृष्ठभागावर येत नाहीत.<br /><br />कुठल्याही उतरंडीत व्यक्तीला आहे त्यापेक्षा वरचं स्थान हवं असतं.<br />जावा जावांचंही तेच, सत्ता माझ्याकडे हवी, मान मला मिळायला हवा.<br />नणंद भावजयीच्या नात्यातही तेच, मुलीने लग्न झालं म्हणून माहेर संपवूनच टाकावं, तिथे पाहुण्यासारखंच राहावं, हे मला पटतच नाही. तिची आतड्याची माणसे त्या घरात आहेत, तिचं बालपण तिथे गेलेलं आहे. भावाच्या घरात जाऊ देत पण आई-बाबांच्या घरात तिच्याकडे हक्क असावेत, जबाबदारी असावी आणि तिही दुसर्या घरात सून आहे, तिला माहेर असलंच पाहिजे.<br /><br />समाजाचं दडपण आहेच, मान्य करायला हवं. <br /><br />>>"फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे<br />खरं आहे. :)<br />पण घरातली प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या पुरूषाशी वेगवेगळ्या प्रकारे बांधलेली असते.<br />तिची बांधिलकी ठरवून दिलेली आहे.<br />असा गट होणे शक्य नाही. तो होत नाही असाच अनुभव आहे. जर झाला तरी तो पुरूषांविरूद्ध उभा राहात नाही.<br /><br />>>म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.<br />अनुमोदन!<br /><br />बायकांमधे अशी परिस्थिती आहे म्हणून पुरूष अगदी सद्गुणाचे पुतळे असंही नाही.<br />’भाऊबंदकी’ हा भाषेत स्थिरावलेला शब्द आहे.<br />भाऊ भाऊ, वडील - मुलगा, कोर्टात जाऊन लढल्याची किती उदाहरणे असतील.<br />भावाभावात तेढ आ्ली म्हणून नीट खेळीमेळीत असणार्या जावांना एकमेकींशी अबोला धरावा लागतो.<br />हेवेदावे आणि मत्सर यात पुरूष कुठेही कमी नाहीत.<br /><br />ही परिस्थिती बदलायची असेल तर आशा म्हणते तसं आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी पुरूषाला ठेवणं बंद केलं पाहिजे.<br />"माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी मी आहे", हे पाहिलं पाहिजे.<br />विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-60081283712890042402013-09-27T05:28:36.851-02:302013-09-27T05:28:36.851-02:30किती काळ आपण पुरुषप्रधान संस्कृतीला दोष देत बसायचं...किती काळ आपण पुरुषप्रधान संस्कृतीला दोष देत बसायचं? याच समाजाची स्त्रीही एक घटक आहे आणि ती ही जबाबदार आहेच. कारण आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ती पुरुषाला ठेवते/मानते. वडील, नवरा, मुलगा... तिचं आयुष्य त्यांच्याभोवतीच फ़िरत असतं. माझ्यामते स्त्रियांनी ही मानसिकता बदलायला हवी. खरंतर दोन स्त्रियांमधे चांगले संबंध निर्माण होण्यास पुरुष कशाला मधे हवा? हा बदल एकदम होणार नाही हे मान्य आहे, पण त्यादृष्टीने विचार तर करायला हवा. <br />दुसरं म्हणजे हे हेवेदावे, मत्सर वगैरे फ़क्त स्त्रियांनाच लागू का? दोन पुरुषांमधेही ह्या भावना असूच शकतील की.<br />आशाhttps://www.blogger.com/profile/00197640632959616311noreply@blogger.com