tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post3626605010518520239..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातली आपली गरज..विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-17710962549496375442012-06-18T14:05:23.299-02:302012-06-18T14:05:23.299-02:30पियू तुझे स्वागत.
तुझे ब्लॉग वाचले. तू खूप मोकळेप...पियू तुझे स्वागत.<br /><br />तुझे ब्लॉग वाचले. तू खूप मोकळेपणाने लिहीत आहेस ते खूप आवडले. <br /><br />>>मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते<br /><br />आपल्यावाचून कोणाचं आडलं आहे, आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार सर्वसाधारणपणे व्यक्तिचा अहंभाव सुखावणारा असतो.<br />खरतर मला वाटतं प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट ही क्रुतीतून, बोलण्यातून दाखवली पाहिजे अस नाही. ते व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. त्यापेक्षा अडचणीच्यावेळी साथ असणं, भावनिक, मानसिक आधार असणं, एकमेकांना जाणणं हे कितीतरी पटीने मोलाच आहे.वैशालीhttps://www.blogger.com/profile/13205546472503052648noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-81961165524568610222012-06-18T03:21:09.778-02:302012-06-18T03:21:09.778-02:30खरंच पियू, तुझ्या लग्नाला सहाच महिने झाले आहेत. अज...खरंच पियू, तुझ्या लग्नाला सहाच महिने झाले आहेत. अजून थोडा वेळ जाऊ दे. प्रत्येक संसारात प्रॉब्लेम्स असतात, तशी गंमतही असते. ती गंमत शोधून त्याचा आनंद घ्यायला विसरू नकोस. <br />All THE BEST!!!स्मिताhttps://www.blogger.com/profile/09633501357899427965noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-6175195269175628252012-06-16T14:49:47.651-02:302012-06-16T14:49:47.651-02:30अम्म.. खंर तर माझं जरास चुकलंच.. अश्विनीने म्हटलंय...अम्म.. खंर तर माझं जरास चुकलंच.. अश्विनीने म्हटलंय तसं "त्याचं माझ्यावाचून पदोपदी अडत/ मुळीच अडत नाही" हेच मी कदाचित त्याच्या आयुष्यातल माझं स्थान वगैरे ठरवायचं माप समजत होते.. खंर तर माझा अहंकार कुठेतरी दुखावला गेला होता..<br /><br />सगळ्या प्रतिक्रियांशी सहमत.. माझं खरंच चुकलं...पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-59430921031304220012012-06-16T14:41:41.432-02:302012-06-16T14:41:41.432-02:30"तुमच्या लग्नाला ६च महिने झाले आहेत, एकदम आयु..."तुमच्या लग्नाला ६च महिने झाले आहेत, एकदम आयुष्यातलं स्थान वगैरेपर्यंत पोचण्यात घाई होते आहे"<br /><br />अनुमोदनआनंदhttps://www.blogger.com/profile/01437238491943136037noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-90971014975545740112012-06-16T10:21:05.574-02:302012-06-16T10:21:05.574-02:30खूप छान समजावलस.. पटतंय... :)खूप छान समजावलस.. पटतंय... :)पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-12183378730691397962012-06-16T01:34:59.576-02:302012-06-16T01:34:59.576-02:30>>मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थ...>>मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते?<br />माझ्यामते अहंकार दुखावल्यामुळे / अपेक्षाभंगामुळे<br />आपल्यावाचून कोणाचं अडतं हे अहंकार सुखावणारं असतं. आपण किती महत्त्वाचे असा समज मनात होतो किंवा असंच महत्त्व द्यावं अशी अपेक्षा केली जाते. मग त्यादृष्टीनेच विचार केला जातो. ‘त्याला फ़क्त माझ्याच हातचं अमुक एक आवडतं किंवा अमुक एक बाबतीत त्याचं माझ्यावाचून पान हलतं नाही..’ असं स्वत:चं महत्त्व वाढवणं सुरू होतं. पण हे लक्षात येत नाही की हळूहळू आपणच स्वत:ला बंधनात जखडून घेतो आहोत (साधं उदाहरण म्हणजे नोकरीत आपल्यावाचून काम अडतं, आपण महत्त्वाचे हे छानच वाटत असतं. पण रजा घ्यायची असते किंवा कामात बदल हवा असतो तेव्हा हेच कारण आड येतं. मग ‘डेलिगेशन’चं महत्त्व लक्षात येतं:)). जर स्वत:चं स्वतंत्र / स्वावलंबी असणं मोलाचं वाटत असेल तर इतरांनी आपल्यावर अवलंबून राहावं / आपल्यावाचून त्यांचं अडावं असा विचार का?<br /><br />एखाद्याच्या आयुष्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असं मला तरी वाटत नाही. काळाच्या ओघात ते आपोआपच तयार होतं. तुमच्या सहजीवनाची तर आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. ह्या नात्याला फ़ुलायला वेळ दे :). <br />अश्विनीने लिहिलंय तसं, एकमेकांचे स्वातंत्र्य जपणं, आपापली 'स्पेस' तयार करणं /जपणं मलाही महत्वाचं वाटतं आणि हे फ़क्त नवर्यासाठीच नाही तर मुलांच्याबाबतीत किंवा कुटुंबातील प्रत्येकाच्या बाबतीतच लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं.आशाhttps://www.blogger.com/profile/00197640632959616311noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-39150043342887118042012-06-15T16:11:28.096-02:302012-06-15T16:11:28.096-02:30तुझा प्रतिसाद खूप आवडला.. नक्की विचार करेन. आभार.....तुझा प्रतिसाद खूप आवडला.. नक्की विचार करेन. आभार..पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-71529375049358522892012-06-15T16:08:03.255-02:302012-06-15T16:08:03.255-02:30नक्की विचार करेन. प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.नक्की विचार करेन. प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-90195493603248437962012-06-15T08:57:54.394-02:302012-06-15T08:57:54.394-02:30'त्याचं माझ्यावाचून पावलोपावली अडतं' आणि &...'त्याचं माझ्यावाचून पावलोपावली अडतं' आणि 'त्याचं माझ्यावाचून मुळीच अडत नाही' ही त्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान ठरवण्याची मापेच नव्हेत. आपलं एकमेकांवाचून किती अडतं, यापेक्षा आपण एकमेकांना स्वतंत्रपणे वाढायला, फुलायला, आपापली 'स्पेस' जपायला कशी मदत करतो; हे जास्त महत्वाचं नाही का?<br /><br />'मग एखाद्याच्या आयुष्यात असे स्थान निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं?' - या प्रश्नाला काही नेमकं उत्तर असणार नाही आणि त्याच्या आयुष्यात आपलं स्थान काय हे तसा कसोटीचा प्रसंग आल्याशिवाय कळणारही नाही.<br /><br />बोलून व्यक्त होणं, प्रत्येक गोष्ट शेअर करणं ही प्रत्येकाची गरज असेलच असं नाही किंवा, तसा प्रत्येकाचा स्वभाव असेलच असं नाही. आपण जसजसं एकमेकांना ओळखत जाऊ तसतशा या गोष्टी आपलं आपल्यालाच उलगडत जातात.अश्विनीhttps://www.blogger.com/profile/10116182468594644785noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-72803812744302045202012-06-15T08:56:36.155-02:302012-06-15T08:56:36.155-02:30१) शेरलॉक होम्सने म्हंटल्याप्रमाणे आधी डोक्यात निष...१) शेरलॉक होम्सने म्हंटल्याप्रमाणे आधी डोक्यात निष्कर्ष ठरवून घ्यायचा आणि मग त्याच्या समर्थनार्थ असलेली उदाहरणे (च फक्त) गोळा करायची असं होतंय का हे अगदी स्वत:शीच तपासून बघा<br /><br />२) आपण आपल्या डोक्यात काही आडाखे ठरवून घेतलेले असतात, जोडीदाराचे performance indicators म्हणूयात. गंमत (किंवा मेख) अशी आहे की हे आडाखे आपण मनात धरतो आणि त्याप्रमाणे वागला नाही की खट्टू होतो. (दिलवालेतलं पलटके देखा तो.. हे सिनेमात छान वाटतं पण प्रत्यक्षात तसं नाही ना होणार.)<br /><br />३) आपले अनुभव, आपले प्रश्न हे वैयक्तिक असतात. प्रत्येकवेळेला त्याचं सामान्यीकरण (generalisation) करणं योग्य असेलच असं नाही. म्हणजे मला असं वाटतं,दिसतं,जाणवतं आहे, तर हा लगेच बायांचा समान प्रश्न होईल का ? <br /><br />तुमच्या लग्नाला ६च महिने झाले आहेत, एकदम आयुष्यातलं स्थान वगैरेपर्यंत पोचण्यात घाई होते आहेमिलिन्द बामhttps://www.blogger.com/profile/03639176509485470961noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-16505240756858353412012-06-15T07:48:36.185-02:302012-06-15T07:48:36.185-02:30अच्छा.. म्हणजे जे चालू आहे (पांगळे न बनवण्याचे प्र...अच्छा.. म्हणजे जे चालू आहे (पांगळे न बनवण्याचे प्रयत्न) ते योग्य आहेत तर...<br />पण मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते? (का असे फक्त सुरुवाती-सुरुवातीला होते?)<br /><br />आणि.. ब्लॉग च्या शेवटी लिहिलंय तसं... त्याच्या आयुष्यात आपली काही जागा असावी असं आपल्याला वाटत.. मग एखाद्याच्या आयुष्यात असे स्थान निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं?<br /><br />या बाबतीत सासूबाईंचा आदर्श ठेवून नाही चालणार (त्यांनी नवऱ्याच्या मनात कितीही स्थान निर्माण केले असले तरी). त्या त्याची आई होत्या. पण बायको म्हणून त्याच्यासाठी स्वत:च्या एकूण एक इच्छांना मुरड घालून केवळ त्यालाच आपले विश्व बनवले तर मग तू म्हणतेस तसे आपल्याला स्वत:चा आनंद मनमोकळेपणाने घेता येणार नाही.<br /><br />त्याच्याशी बोलून त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडी-अडचणीत साथ देणे किंवा त्याचे विचार जाणून घेणे, त्याच्याशी त्याला आवडेल त्या विषयावर चर्चा करणे हे करता येईल.. पण मुळातच नवरा अबोल आणि काही शेअर न करणारा असेल तर?? (जनरली नवरे असेच असतात का ग?)पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-43321002268347876662012-06-15T05:56:47.863-02:302012-06-15T05:56:47.863-02:30तुझा हा ब्लॉग वाचून खूप छान वाटले.ब्लॉग वाचून आणि ...तुझा हा ब्लॉग वाचून खूप छान वाटले.ब्लॉग वाचून आणि मी पंधरा वर्षे मागे गेले. आत्ता तू ज्या मनाच्या अवस्थेत आहेस ते अगदी साहजिकच आहे.नवीन लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काळात आपण आपल्या नव-याच्या घराला,त्यातील माणसांना आपलेसे करण्यासाठी हरत-हेने प्रयत्न करत असतो.आपलंस करण्यासाठी आपण त्यांच्यात सामावून जाण्यासाठी बारीक बारीक गोष्टींमध्ये जीव लावून,त्यानुसार प्रत्येकात गुंतवू बघत असतो.आणि खरंच सांगते की हे सगळं करण म्हणजेच प्रेम ही समज करवून घेतो.म्हणजे मी बायको म्हणून माझ्या नव-याच्या बारीक बारीक गोष्टी खूप जपीन.कींवा तुझ्या म्हणण्यानुसार आपण त्याला इतकं पांगळ बनवतो की तो आपल्यावर अवलंबून रहावा,अथवा त्याचे आपल्यावाचून आडावे.आणि हे म्हणजेच प्रेम.पण खरंच शांतपणे विचार केलास तर तुलाही कळेल की यात प्रेम नसून सगळ्यांनी त्या त्या कामासाठी तुला गॄहीत धरणे आहे.जे वरवर पहाता आपल्याला प्रेम असल्याचा भास असतो.<br />आपला स्वत:चा आनंद ,आपल्याला मजा येण्याच्या गोष्टी या कोणाही माणसावर अवलंबून ठेवू नकोस. बघ ती व्यक्ती जर आपल्या बरोबर असेल तर नक्कीच मजा येते.पण नाही म्हणून ती गोष्ट करायचीच नाही हे चुकीचे आहे.आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर त्याच्याशिवाय.....प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहीजे. तो कोणावर अवलंबून ठेवू नये.नवीन नवीन लग्न झाल्यावर हे वाटूच शकतं.हे मी तुला लग्नाला पंधरा वर्षे झाल्यावर सांगत आहे.यावर नक्की विचार कर.दीपश्रीhttps://www.blogger.com/profile/04279127686401147152noreply@blogger.com